IND vs PAK Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: पाकिस्तानच्या आडमुठ्या धोरणानं क्रिकेट फॅन्स 'क्लीन बोल्ड'; हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी कोलंबोतील हॉटेल अन् तिकिटांचे दर गगनाला भिडले

India vs Pakistan T20 World Cup 2026: हाय-व्होल्टेज सामन्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा सर्वात मोठा फटका या खेळाच्या खऱ्या पाठीराख्यांना म्हणजेच चाहत्यांना बसला.

Manish Jadhav

India vs Pakistan T20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत-पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा सर्वात मोठा फटका या खेळाच्या खऱ्या पाठीराख्यांना म्हणजेच चाहत्यांना बसला. राजकीय घडामोडी आणि पाकिस्तान सरकारच्या विसंगत भूमिकेमुळे अनेक क्रिकेट प्रेमींना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला असून प्रशासकीय गोंधळाचा हा फटका सामन्याच्या तिकिटापेक्षाही महाग पडला.

सुरुवातीला पाकिस्तान (Pakistan) सरकारने भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्याने श्रीलंका दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या चाहत्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. ज्यांनी कोलंबोसाठी महागडी विमाने आणि हॉटेल्स बुक केली होती, त्यांनी अधिक नुकसान टाळण्यासाठी घाईघाईत आपल्या बुकिंग रद्द केल्या. मात्र, 9 फेब्रुवारी रोजी अचानक पाकिस्तान खेळणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले आणि चाहत्यांची मोठी पंचाईत झाली.

या संपूर्ण प्रक्रियेत ज्या चाहत्यांनी आधी बुकिंग रद्द केले होते, त्यांना आता पुन्हा नियोजन करताना मूळ किमतीच्या तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. हॉटेलची भाडी गगनाला भिडली असून विमानाची तिकिटे मिळेनाशी झाली आहेत. कोणतीही चूक नसताना केवळ राजकीय दावे-प्रतिदावे आणि प्रशासकीय धरसोड वृत्तीमुळे सर्वसामान्य चाहत्यांचे लाखो रुपये वाया गेले. ही घटना आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील एका गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधते.

जेव्हा राजकीय फायद्यासाठी खेळाचा वापर केला जातो, तेव्हा त्याचा प्रत्यक्ष फटका अधिकाऱ्यांना किंवा खेळाडूंना बसत नाही, तर तो खिशातून पैसे खर्च करणाऱ्या प्रेक्षकांना बसतो. क्रीडा संस्था स्वतःचे उत्पन्न आणि ब्रॉडकास्टिंग रेवेन्यू जपण्यात यशस्वी होतात, पण चाहत्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणीही घेत नाही.

येत्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो येथे हा हाय-प्रोफाइल सामना होणार आहे, परंतु त्यापूर्वी घडलेल्या या घडामोडींनी खेळाच्या 'बॅकबोन' समजल्या जाणाऱ्या चाहत्यांची हतबलता समोर आणली आहे. मुत्सद्देगिरी आणि सार्वजनिक प्रदर्शनाच्या नादात चाहत्यांच्या भावना आणि कष्टाचा पैसा यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा सामने वाचवल्याचा दावा प्रशासन करते, तेव्हा त्यामागे किती सामान्य लोकांनी संधी आणि पैसा गमावला आहे, याची आकडेवारी कुठेही चर्चिली जात नाही.

भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला असली, तरी या आर्थिक फसवणुकीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अशा अनिश्चिततेच्या काळात चाहत्यांच्या संरक्षणासाठी काही ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT