Modi Cabinet Decision For Farmers Dainik Gomantak
अर्थविश्व

Central Government Scheme For Farmers: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! आजपासून आणखी एक नवीन योजना सुरु, करोडो लोकांना होणार फायदा!

Farmers: केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने आज शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना मंजूर केली आहे.

Manish Jadhav

Cabinet Decision For Farmers: केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने आज शेतकऱ्यांसाठी आणखी एक योजना मंजूर केली आहे. पीएम किसान योजना, किसान क्रेडिट कार्ड याशिवाय आतापासून देशातील करोडो शेतकऱ्यांना पीएम-प्रणाम योजनेचा लाभ मिळणार आहे.

आज केंद्र सरकारने या योजनेला मान्यता दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची माहिती दिली होती.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

दरम्यान, पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 'पीएम-प्रणाम' या नवीन योजनेला मंजूरी दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात PM PRANAM (PM Program for Restoration, Awareness, Creation, Nurturing and Improvement of Earth) योजना लागू करण्याची घोषणा केली होती.

या योजनेचा उद्देश काय आहे?

दुसरीकडे, या योजनेच्या माध्यमातून सरकार (Government) रासायनिक खतांच्या अनुदानात कपात करण्याचे काम करेल, ज्यामुळे शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होईल.

कमी रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत तर सुधारेलच, शिवाय लोकांना अधिक सकस आहार मिळू शकेल आणि त्यांची जीवनशैलीही सुधारेल. याशिवाय सरकारचा खर्चही कमी होईल.

मनसुख मांडविया यांनी माहिती दिली

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्रकारांना सांगितले की, या योजनेअंतर्गत केंद्र राज्यांना पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहित करेल.

3,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे

उदाहरण देत मांडवीय म्हणाले की, जर 10 लाख टन पारंपरिक खतांचा वापर करणाऱ्या राज्याने त्याचा वापर तीन लाख टनांनी कमी केला तर 3,000 कोटी रुपयांच्या अनुदानाची बचत होईल. या उर्वरित अनुदानापैकी 50 टक्के म्हणजेच 1,500 कोटी रुपये त्या राज्याला पर्यायी खतांचा वापर आणि इतर विकासकामांसाठी दिले जातील.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीही हा निर्णय घेण्यात आला

याशिवाय, आज देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उसासाठी एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर भाव 315 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. हे विपणन वर्ष 2023-24 साठी लागू करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशिवाय 5 लाख कामगारांना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT