Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Dainik Gomantak
महाराष्ट्र

75th Independence Day: महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणाण्याचे दिले निर्देश

दैनिक गोमन्तक

नो हॅलो आता 'वंदे मातरम' (Vande Mataram) म्हणत आतापासून सरकारी कार्यालयात कामाला लागा! सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खाते मिळताच पहिली घोषणा केली. त्यांनी केवळ घोषणाच केली नाही तर त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही सर्वांना दिल्या आहेत. अशाप्रकारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आतापासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर संवाद सुरू करताना हॅलोच्या ऐवजी 'वंदे मातरम' असं म्हणतील. नमस्कार म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणावे लागणार आहे तर लवकरच याबाबत अधिकृत आदेशही जारी केला जाणार आहे. (75th Independence Day Maharashtra govt directs officials to say Vande Mataram instead of Hello)

रविवारी महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांना वन, सांस्कृतिक उपक्रम आणि मत्स्यव्यवसाय मंत्री करण्यात आल्याची घोषणा होताच सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी तातडीने आपल्या मंत्रालयाच्या कामाची तयारी सुरू केली आणि पहिला निर्णय देखील घेतला आहे. आतापासून हॅलो-वेलो बंद, वंदे मातरम उत्साहाने म्हणा एवढेच ऐकू यायला हवे. पक्ष कधी म्हणेल - जोश कसा आहे? मुनगंटीवार यांचे उत्तर नेहमीच असते- हाई सर! असंच देतील असंही ते यावेळी म्हणाले

'वंदे मातरम्' हा केवळ शब्द नाही, तर ती प्रत्येक भारतीयाची भावना आहे! आणि ते नसा-नसा मध्ये भिनायला हवे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ सांगितले की, 'हॅलो' हा एक परदेशी शब्द आहे. त्याचा त्याग करणे आवश्यक आहे आणि वंदे मातरम् हा केवळ शब्द नसून ती प्रत्येक भारतीयाची भावना आहे.

तर वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगीत आहे. 1875 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम् गीत त्यावेळच्या स्वातंत्र्यलढ्याला ऊर्जा देणारे होते. 'हे आई, मी तुला नमन करतो' ही भावना व्यक्त करून बंकिमचंद्रांनी देशभक्तीच्या आवेशाची जाणीव लोकांच्या मनात पसरवली होती.

'वंदे मातरम हे भारतीय मानसाचे हृदय आहे! वंदे मातरम म्हणजे भावनांची सिंधू!

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या रचनेतील प्रत्येक शब्द उच्चारला, भारतीय मानसाचे हृदय, तर देशभक्तीची भावना शिरपेचामध्ये जागृत होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवात 'नमस्कार' या विदेशी शब्दाचा त्याग करून आतापासून सरकारी कार्यालयांमध्ये वंदे मातरम् म्हणत आपण आपल्या बोलण्याची सुरुवात करूयात.

1800 सालापासून जेव्हा टेलिफोन अस्तित्वात आला तेव्हापासून आम्ही हॅलो या शब्दाने आमचे बोलणे सुरू करायला आलो आहोत मात्र आता नमस्काराऐवजी वंदे मातरम म्हणत संवादाला सुरुवात होणार. या निर्णयाबाबतचा शासन आदेश लवकरच सांस्कृतिक कार्य विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT