Rohit Sharma & Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियालाने दिले 15 वर्षे जुन्या रेकॉर्ड्सला आव्हान, 2008 मध्ये टीम इंडिया...

IND vs AUS 4th Test: टीम इंडियासमोर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान उभे राहिले आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने झाले असून चौथा सामना सुरु आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 4th Test: टीम इंडियासमोर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान उभे राहिले आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने झाले असून चौथा सामना सुरु आहे. एखाद्या संघाने जवळपास दोन दिवस फलंदाजी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, आता चेंडू टीम इंडियाच्या कोर्टात परतला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या, तर टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 36 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर (Team India) मोठे आव्हान उभे केले आहे. आव्हान असे आहे की, कांगारु संघ गेल्या 15 वर्षांत जे केले नाही ते करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

या सामन्यात टीम इंडियाही मागे नाही, पण भारतीय संघ इथून सामना जिंकण्याची शक्यताही कमी आहे. अहमदाबादच्या या मैदानावर टीम इंडियाचा गेल्या 15 वर्षांचा रेकॉर्ड काय आहे, ते जाणून घेऊया.

अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता

अहमदाबादमधील स्टेडियम जे आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे, ते पूर्वी मोटेरा ​​म्हणून ओळखले जात होते.

टीम इंडियाने या मैदानावर गेल्या 15 वर्षांपासून एकही सामना गमावलेला नाही. 2008 मध्ये टीम इंडिया येथे हरली होती, तेव्हापासून एकतर सामना जिंकला किंवा अनिर्णित राहिला.

तसेच, 2008 मध्ये अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नेतृत्वाखाली टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता.

त्यानंतर भारतीय संघाचा एक डाव आणि 90 धावांनी पराभव झाला. तेव्हापासून आजचा दिवस आहे, टीम इंडियाने अहमदाबादमध्ये एकही सामना गमावलेला नाही.

या पराभवानंतर 2009 आणि 2010 मध्ये आधी श्रीलंका आणि नंतर न्यूझीलंडशी सामना अनिर्णित राहिला.

यानंतर, 2012 साली इंग्लंडचा 9 विकेट्सनी पराभव झाला होता. 2021 मध्ये, टीम इंडियाने येथे इंग्लंडकडून सलग दोन कसोटी सामने खेळले आणि पहिल्या सामन्यात 10 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला.

त्या सामन्यानंतर आता येथे कसोटी सामना खेळवला जात आहे. म्हणजेच, येथे न हारण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर तब्बल 15 वर्षांपासून आहे.

टीम इंडियासमोर डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याचे आव्हान आहे

टीम इंडियासमोर अडचण अशी आहे की, जर सामना हरला नाही आणि अनिर्णित राहिला, तर श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेपैकी किमान एक तरी श्रीलंका हरणार नाही, अशी आशा बाळगावी लागेल.

म्हणजेच, भारतीय संघाची अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली, तर मालिका काबीज होईल, पण त्यानंतर त्यांना श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर लक्ष ठेवावे लागेल.

जर श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकले तर टीम इंडिया WTC म्हणजेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून बाहेर पडेल, तर एकही सामना अनिर्णित राहिला तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.

मात्र, अजून तीन दिवस बाकी असून भारतीय संघ पलटवार करुन सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल, अशी अपेक्षा करायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT