पणजी: बंगालच्या उपसागरात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेले ‘मोंथा’ चक्रीवादळ शमल्यामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील सहा दिवस राज्यात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात पावसाने राज्यात समाधानकारक हजेरी लावली. परंतु, मान्सून हंगाम संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळ तयार झाल्याने त्याच्या प्रभावामुळे राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
मान्सून संपल्यानंतर १ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात राज्यात १७.११ इंच पावसाची नोंद झाली. त्यातील सुमारे १२ इंच पाऊस ‘मोंथा’ चक्रीवादळ तयार झाल्यानंतरच्या काळात पडला. १ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात राज्यात सरासरी ६.६० इंच पाऊस पडतो.
पण, यंदा या काळात १७.११ इंच पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीच्या सुमारे १५९ टक्के इतका अधिक राहिल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीतून दिसून येते. दरम्यान, मान्सूनोत्तर काळात पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या भातपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.