पणजी: गोव्यातील मच्छीमारांना राज्य सरकार व मत्स्यसंपदा विभागाचा अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचा गंभीर आरोप ‘गोयचो रापोणकरांचो एकवट’ संघटनेने केला आहे. संघटनेचे सरचिटणीस ओलान्सियो सिमॉइस यांनी सांगितले की, गोव्यात बेकायदेशीरपणे घुसून मासेमारी करणाऱ्या बोटी आम्ही पकडून दिल्या, याला तीन महिने झालेत. मात्र, राज्य सरकारने आमच्या सुरक्षेसाठी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.
मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी बेकायदेशीर मासेमारीसाठी दंडवाढीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत हे निर्णय प्रत्यक्षात अमलात आलेले नाहीत. आम्ही लवकरच मंत्र्यांना भेटून निवेदनाद्वारे आमच्या मागण्यांची पुनरावृत्ती करणार आहोत, असे ओलान्सियो यांनी सांगितले.
गोव्याच्या सीमेजवळ मालपे येथून बोटी येत आहेत. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या पथकाकडे एकही बोट नाही. ही बोट कधी येणार आणि आम्हाला सुरळीत व्यवसाय कधी करता येईल, याचे उत्तर नाही. आता आमचा संयम संपत चालला आहे, असा इशारा मच्छीमार संघटनेने दिला आहे.
मच्छीमारांचा संयम ताणला जात असून, सरकारने अंत पाहू नये, असा रोखठोक इशारा संघटनेने दिला आहे. आमचे केवळ आश्वासनांवर समाधान नाही. सरकारने ठोस कृती करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा ओलान्सियो यांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.