Aditya Thackeray On Mumbai Goa Highway
Aditya Thackeray On Mumbai Goa Highway Dainik Gomantak
गोवा

"दिवसाला दोन-दोन हजार किलोमीटर रस्ते बांधणारे, Goa-Mumbai Highway अजून पूर्ण करू शकले नाहीत"

Ashutosh Masgaunde

Aditya Thackeray On Mumbai-Goa Highway:

माजी मंत्री आणि शेवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील रास्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरही भाष्य केले.

देशात एका दिवसात दोन दोन हजार किलोमीटर रस्ते बांधले जात आहेत. पण मुंबई-गोवा महामार्ग 7-8 वर्षे झाली तरी पूर्ण झाला नाही. अशी टिप्पणी अदित्य ठाकरे यांनी केली.

मागच्या नोव्हेंबरमध्ये मुंबईतील वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेसवे एमएमआरडीए (MMRDA) ने मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केले. या रस्त्यांची देखभाल आता महापालिकेच्या खर्चातून केली जात आहे.

मुंबईकरांच्या पैशातून हे दोन्ही रस्ते सांभाळले जात असतील, तर टोलनाके अजूनही का आहेत? तो पैसा एमएसआरडीसीकडे जातो का? या दोन्ही रस्त्यांवरील होर्डिंगचे पैसे एमएसआरडीसीकडे का जात आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

हे दोन्ही रस्ते हस्तांतरित झाल्याने टोलनाके आणि होर्डिंग्जमधून मिळणारा पैसाही मुंबई महापालिकेकडे जायला हवा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

माझ्या माहितीप्रमाणे MSRDC अजूनही या रस्त्यांवर टोल वसूल करत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुंबईकरांचा पैसा वापरला जात आहे. मग मुंबईकरांवर दुहेरी जबाबदारी, दुहेरी कर का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुंबई-गोवा महामार्ग अजूनही अपूर्ण का?

देशात सर्वाधिक कर मुंबईकर भरत असतानाही मुंबईतील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. देशात आज एका दिवसात दोन दोन हजार किलोमीटर रस्ते बांधले जात आहेत.

मात्र, मुंबई-गोवा महामार्ग सात-आठ वर्षांत पूर्ण होऊ शकला नाही. तसेच मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik) महामार्गावरही चंद्रासारखे मोठे खड्डे पडले आहेत. तेथे दुरुस्ती होत नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पुढे बोलताना अदित्य ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करणे गरजेचे होते. पण दिल्लीस्वारांचे वारे वाहत आहेत, त्यामुळे त्यांना वेळ नाही, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

मी मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाला पत्र पाठवून दोन मागण्या केल्या आहेत. वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेसाठी मुंबईकर टॅक्स भरत आहेत, हे मान्य असेल, तर टोलनाके तातडीने रद्द करावेत. त्यांनी घटनाबाह्य सरकारशी बोलून सरकारच्या ठेकेदार मित्रांशी बोलून तोडगा काढावा, वन टाइम सेटलमेंट करून हे टोलनाके बंद करावेत. या रस्त्यांवर लावल्या जाणाऱ्या होर्डिंग्जचा संपूर्ण महसूल मुंबई महापालिकेकडे यायला हवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT