Uttar Pradesh Storm DainikGomantak
देश

Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात आस्मानी संकटाचा कहर! भीषण वादळात 54 जणांचा मृत्यू; काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं

UP Dust Storm Deaths: उत्तर प्रदेशात बुधवारी (13 मे) संध्याकाळी आलेल्या भीषण वादळ आणि चक्रीवादळाने अनेक कुटुंबांवर काळाचा घाला घातला.

Manish Jadhav

Uttar Pradesh Storm News: उत्तर प्रदेशात बुधवारी (13 मे) संध्याकाळी आलेल्या भीषण वादळ आणि चक्रीवादळाने अनेक कुटुंबांवर काळाचा घाला घातला. राज्याच्या विविध भागांत सोसाट्याचा वारा, पाऊस आणि वीज पडल्यामुळे तब्बल 54 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक ठिकाणी मोठी झाडे मुळासकट उखडून पडली, तर अनेक कच्ची घरे कोसळून ढिगाऱ्याखाली दबली गेल्याने निष्पापांना आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, भदोही जिल्ह्यात वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला असून येथे 15 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सुरियावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरगसेनपट्टी येथे एका घरावर झाड पडल्याने आई आणि तिच्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. जिल्हाधिकारी शैलेश कुमार यांनी 15 मृत्यूंची पुष्टी केली असून, 8 जण जखमी असल्याचे सांगितले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी वाराणसी येथील बीएचयू रुग्णालयात हलवण्यात आले. केवळ माणसेच नव्हे, तर या आपत्तीत 16 पाळीव जनावरांचाही बळी गेला.

भदोहीप्रमाणेच प्रयागराज (Prayagraj) आणि मिर्झापूर जिल्ह्यांतही वादळाने मोठे नुकसान केले. प्रयागराजमध्ये सर्वाधिक 16 जणांना आपला जीव गमवावा लागला असून मिर्झापूर जिल्ह्यात 10 मृत्यूंची नोंद झाली. मिर्झापूरमध्ये सात मृत्यू केवळ सदर तहसीलमध्ये झाले असून चुनार तहसीलमध्ये तीन जण दगावले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज कोसळणे, भिंती पडणे आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमुळे ही जीवितहानी झाली. जिल्हा प्रशासनाने मृतांच्या वारसांना मदतीचे आश्वासन दिले.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इतर जिल्ह्यांतही मृतांचा आकडा समोर येत आहे. फतेहपूर जिल्ह्यात 9, हरदोईमध्ये 2, तर कानपूर देहात आणि कौशांबीमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला आणि सोसाट्याचा वारा सुटला. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाकडून आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून जखमींवर विविध आरोग्य केंद्रांत उपचार केले जात आहेत. प्रशासनाने नागरिकांना हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: असह्य उष्म्याने नागरिक हैराण; किमान तापमानाचाही उच्चांक, पारा 36 अंशांवर; मान्सूनपूर्व पावसाअभावाचाही परिणाम

VIDEO: 'मुंबईच्या राजा'चा रुबाब! रोहितला पाहताच 'रशियन सुंदरी' झाल्या वेड्या, रेस्टॉरंटमधील व्हिडिओ व्हायरल

Valpoi: पाय गमावलेल्या गौरवला अखेर आरोग्यमंत्र्यांकडून मदतीचा हात! 25 लाखाचे साहाय्य जाहीर, चौकशी समितीही स्थापन

Viral Video: वंदे भारत बनली 'भाजी मंडई'! 700 रुपयांचे तिकीट 380 मध्ये विकणाऱ्या टीटीईचा 'स्टिंग ऑपरेशन'ने पर्दाफाश; रेल्वेकडून तत्काळ निलंबन

National Interest: PM मोदींचे आवाहन राष्ट्रहितासाठी! यतीश नायक विरोधकांवर बरसले, म्हणाले, 'अर्थहीन राजकारण करु नका'

SCROLL FOR NEXT