World Peace Day | Gandhi Einstein Relationship | Gandhi Einstein Letters Dainik Gomantak
देश

अहिंसेच्या विचाराने प्रभावित झालेल्या आइनस्टाईनचा महात्मा गांधींसोबत काय 'पत्रव्यवहार' झाला होता?

Gandhi Einstein Relationship: महात्मा गांधीजींनी आफ्रिकेतून परतल्यावर अहिंसेच्या मार्गावर चालत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले तर आइनस्टाईनने वैज्ञानिक क्षेत्रात उपयुक्त कार्य केले.

Sameer Panditrao

या लेखात तुम्ही काय वाचाल

१. महात्मा गांधी आणि आइनस्टाईन यांच्यात पत्रव्यवहार होत होता.

२. आइनस्टाईनगांधीजींच्या कार्याने प्रभावित झाले होते.

३. दोघांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

महात्मा गांधी आणि अल्बर्ट आइनस्टाईन ही दोन महान व्यक्तिमत्वे आपल्याला माहिती आहेतच. महात्मा गांधीजींनी आफ्रिकेतून परतल्यावर अहिंसेच्या मार्गावर चालत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले तर आइनस्टाईनने वैज्ञानिक क्षेत्रात उपयुक्त कार्य केले. दोघांच्यात मात्र एक समान धागा होता, तो म्हणजे शांततेचा.

आगामी पिढ्या कदाचित यावर विश्वास ठेवणार नाहीत की असा एक मनुष्य, हाडामांसाचा बनलेला, या पृथ्वीवर होता. हे वाक्य अल्बर्ट आइनस्टाईन यांनी महात्मा गांधींच्या ७०व्या जयंतीनिमित्त १९३९ मध्ये म्हटले होते.

आइनस्टाईन गांधीजींच्या विचारांनी प्रचंड प्रभावित झाले होते. या दोघांची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही, मात्र त्यांचा एकमेकांशी पत्रव्यवहार सुरु होता. गांधीजींचे कार्य जगभर पोहोचल्यानंतर आइनस्टाइन यांनी त्यांच्या विचारांवर चिंतन केले. १९३० च्या दशकात त्यांनी गांधींना खालील पत्र लिहिले होते. यांनतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला.

अल्बर्ट आइनस्टाईन यांचे महात्मा गांधींना पत्र

"आमचा मित्र यावेळी घरी असल्याचा उपयोग करून मी आपल्याला या ओळी पाठवत आहे. आपल्या कार्याने हे दाखवून दिले आहे की हिंसेशिवायही आपल्याला यश मिळू शकते अगदी त्यांच्याबरोबरही ज्यांनी हिंसेचा मार्ग अजिबात सोडलेला नाही.

आम्ही आशा करतो की आपले उदाहरण देशाच्या सीमांपलीकडे पोहोचेल आणि अशा एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या स्थापनेस मदत करेल, जिचा सर्व लोक आदर करतील, जी निर्णय घेईल आणि युद्ध- संघर्षांचे स्थान कायमचे घेऊन टाकेल. मला आशा आहे की एखाद्या दिवशी मला आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल.”

गांधीजींनी उत्तर देताना लिहिले

"आपले सुंदर पत्र मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला. मी जे काम करत आहे ते आपल्याला माहीत असल्याचे कळल्याने मला खूप बरे वाटले. मी मनापासून इच्छा व्यक्त करतो की आपण प्रत्यक्ष भेटू आणि तेही भारतातील माझ्या आश्रमात.”

आपल्या इच्छा असूनही हे दोन महान व्यक्तिमत्व कधी प्रत्यक्ष भेटले नाहीत. गांधीजींची हत्या झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. यावेळी आइनस्टाईन म्हणाले, “ते त्यांच्या स्वतःच्या तत्त्वांचे शिकार होऊन मरण पावले, कारण आपल्या देशातील अव्यवस्था आणि गोंधळाच्या काळातही त्यांनी स्वतःसाठी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता.”

१९५० मध्ये, गांधीजींच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी , आइनस्टाईन यांनी न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन विद्यापीठातील आपल्या अभ्यासिकेतून संयुक्त राष्ट्रांसाठी एक मुलाखत रेकॉर्ड केली.

ते म्हणाले, “आपण गांधीजींच्या भावनेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे... आपल्या उद्दिष्टासाठी लढताना हिंसेचा उपयोग करू नये, जे आपण वाईट मानतो त्यात भाग घेणे टाळले पाहिजे.”

त्या रेडिओ मुलाखतीत आइनस्टाईन यांनी असहकार आंदोलनाची वकिली केली, त्यांच्या मते तो वाईटाविरुद्धचा शांततापूर्ण विरोधाचा एक मार्ग होता. गांधीजींनी १९२० च्या दशकात हे आंदोलन सुरू केले होते.

आइनस्टाईन यांचा विश्वास होता की जगाला चांगले करायचे असेल, तर ते फक्त नवीन वैज्ञानिक शोधांनी शक्य होणार नाही; त्यासाठी नैतिकता आणि आदर्श हेसुद्धा आवश्यक आहेत.

आइनस्टाईन म्हणाले की जगातील सर्व देशांमध्ये महात्मा गांधी यांच्याविषयी होत असलेले कौतुक यामुळे आहे की घोर नैतिक पतनाच्या काळात गांधी हे कदाचित एकमेव असे राजकारणी होते जे राजकीय क्षेत्रात मानवी नातेसंबंधांच्या उच्च पातळीचे समर्थक होते.

FAQs

१. महात्मा गांधी आणि अल्बर्ट आइनस्टाईन यांच्यातील समानता काय होती?
दोघेही शांततेचे समर्थक होते; गांधीजी अहिंसेच्या मार्गावर, तर आइनस्टाईन जगभर शांतीच्या विचारांवर विश्वास ठेवत होते.

२. आइनस्टाईन गांधीजींबद्दल काय म्हणत होते?
त्यांनी गांधीजींच्या विचारांमुळे प्रभावित होत म्हटले की, अशा मनुष्याचा अस्तित्व विश्वासघातक आहे आणि ते अत्यंत प्रबुद्ध होते.

३. गांधीजी आणि आइनस्टाईन यांची प्रत्यक्ष भेट झाली का?
नाही, प्रत्यक्ष भेट झाली नाही, पण त्यांनी पत्रव्यवहाराद्वारे संवाद साधला होता.

४. आइनस्टाईन यांनी गांधीजींच्या मृत्यूनंतर काय म्हटले?
ते म्हणाले की गांधीजी आपल्या स्वतःच्या तत्त्वांचे पालन करत मरण पावले, कारण देशातील अव्यवस्था असतानाही त्यांनी स्वतःसाठी सुरक्षा घेण्यास नकार दिला.

५. आइनस्टाईन गांधीजींच्या असहकार आंदोलनाबद्दल काय म्हणत होते?
त्यांनी म्हटले की हे आंदोलन वाईटाविरुद्ध शांततापूर्ण विरोध करण्याचा एक मार्ग होता आणि हिंसेचा वापर न करता उद्दिष्ट साधता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT