Jawaharlal Nehru first meeting Gandhi| Jawaharlal Nehru birth anniversary Dainik Gomantak
देश

Jawaharlal Nehru: 'त्यांच्याबद्दल आदर आहे, पण ते जरा...'! गांधीजींच्या पहिल्या भेटीबाबत पंडित नेहरूंनी काय लिहिले?

Jawaharlal Nehru first meeting Gandhi: १४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते.

Sameer Panditrao

१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते. त्यांची पहिली भेट कशी झाली, त्यावेळी नेमके काय घडले आपण हे जाणून घेऊ.

लखनौ शहर हे स्वातंत्र्य आंदोलनातील एक महत्त्वाचे केंद्र होते. येथे अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची झालेली पहिली भेट लखनौसाठी विशेष ठरते. २६ डिसेंबर १९१६ रोजी या दोन नेत्यांची पहिली भेट येथे चारबाग रेल्वे स्थानकावर झाली.

दोघेही नेते काँग्रेसच्या ३१ व्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. याच अधिवेशनात प्रसिद्ध ‘लखनौ करार’ झाला, जो हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानण्यात येतो.

पंडित नेहरूंनी आपल्या टुवर्ड फ्रीडम (Toward Freedom) आत्मचरित्रात या भेटीचा उल्लेख करत लिहिले आहे :

“गांधीजींशी माझी पहिली भेट १९१६ च्या नाताळच्या दरम्यान झालेल्या लखनौ काँग्रेसच्या काळात झाली. आम्हा सर्वांना दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या संघर्षाबद्दल अपार आदर होता. पण ते आम्हा तरुणांना काहीसे दूरचे, वेगळे आणि प्रसिद्धीपासून दूर असलेले राजकारणी वाटायचे. त्यांनी त्या काळात काँग्रेसच्या तसेच राष्ट्रीय राजकारणात भाग घेण्यास नकार दिला होता आणि स्वतःला दक्षिण आफ्रिकेतील भारतीय प्रश्नांपुरते मर्यादित ठेवले होते.”

१९२८ मध्ये, राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय काळात, नेहरूंनी स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत इंडिपेन्डन्स फॉर इंडिया लीग या संघटनेची स्थापना केली.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार,

“१९२८ मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय परिषदेने स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात नव्या राज्यघटनेचा पाया ‘डॉमिनियन स्टेटस’वर असावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. पण काँग्रेसमधील तरुण आणि क्रांतिकारी विचारसरणीच्या गटाने या प्रस्तावाला विरोध केला. या गटाचे नेतृत्व जवाहरलाल नेहरू आणि सुभाष बोस यांनी केले आणि त्यांनी इंडिया इंडिपेन्डन्स लीग स्थापन करून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.”

नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात १९२८ सालच्या या घटनांबाबत उल्लेख करत लिहिले आहे :

“सायमन आयोग भारताच्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेण्यासाठी आला असताना सर्वपक्षीय परिषद लखनौ येथे त्यांच्या समितीचा अहवाल विचारण्यासाठी एकत्र आली होती.” परंतु या परिषदेत काँग्रेस आणि मध्यममार्गी गट यांच्यात भारतासाठी ‘पूर्ण स्वातंत्र्य’ की ‘डॉमिनियन स्टेटस’ या प्रश्नावर मतभेद झाले.

त्या वेळी मोठ्या स्वातंत्र्य गटाच्या वतीने नेहरूंना परिषदेच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करायला सांगण्यात आले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला कमी लेखणाऱ्या कोणत्याही निर्णयाशी त्यांचा संबंध नाही.

नेहरू पुढे लिहितात, “पण आम्ही हेही स्पष्ट केले की, आम्ही साम्प्रदायिक विधानांच्या मार्गात अडथळा आणणार नाही. अशा मोठ्या प्रश्नावर ही भूमिका फार परिणामकारक नव्हती; ती केवळ नकारात्मक होती. मात्र त्याच दिवशी आमच्या संस्थापकांनी आमच्या भूमिकेला सकारात्मक दिशा दिली — इंडिपेन्डन्स फॉर इंडिया लीगची स्थापना करून.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT