Thackeray government in confusion over lockdown 
महाराष्ट्र

अनलॉकबाबत संभ्रमात ठाकरे सरकार

दैनिक गोमंतक

मुंबई : क्रॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्टात अनलॉक बाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. परंतु दोन तासांनी जनसंपर्क आधिकाऱ्यांनी याबाबत हात वर करत अनलॉकबाबत विचाराधीन असून अद्याप निर्बंध उठविण्यात आलेले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळेअनलॉकबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.  

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची लाट ओसरताना दिसत असून, आता अनलॉकच्या (Unlock) प्रक्रियेला राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे.  ही अनलॉकची प्रक्रिया  5 टप्प्यांत विभागण्यात आली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांत संपूर्ण अनलॉक होईल. जेथे पॉझिटिव्हीटी (Positivity) रेट 5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे, आणि तेथे ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत आहेत. या जिल्ह्यांतील सर्व व्यवहार उद्यापासून सुरळीत सुरु होतील. बाकीच्या ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट जसा कमी होईल, त्यानुसार टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येईल.

सिंधुदुर्गात निर्बंध तर रत्नागिरीत कडक लॉकडउन 

कोकणातील (Kokan) सिंधुदुर्ग, रत्नागिरी तिसऱ्या टप्प्यात असून तेथे लॉकडउन कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पासून 9 दिवस कडक लॉकडउन असेल. तर पुणे आणि रायगडला देखील लॉकडउनमधून दिलासा नाही. 

राज्यातील कोणते जिल्हे कोणत्या टप्प्यात आहेत ते पाहू 
पहिल्या टप्प्यात - ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ
दुसऱ्या टप्प्यात - अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार
तिसऱ्या टप्प्यात - अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर 
चौथ्या टप्प्यात - पुणे, रायगड
पाचव्या टप्प्यात - उर्वरित जिल्हे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT