Basavaraj Bommai & Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Vs Karnataka: भाजपशासित दोन राज्यांमधील सीमावाद कसा सुरु झाला?

जलसंकटाचा सामना करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा ठराव मंजूर केल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Vs Karnataka: जलसंकटाचा सामना करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा ठराव मंजूर केल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. यानंतर दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले.

त्यानंतर लगेचच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे खंडन केले आणि म्हटले की, 'अशा कोणत्याही गावाने कर्नाटकात विलीन होण्याची मागणी केलेली नाही.' एएनआयमधील वृत्तानुसार, त्यांनी असेही सांगितले की, 'महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही.'

फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात (Karnataka) जाणार नाही! बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी भाषिक गावे मिळावीत यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात लढा देईल."

यावर या टिप्पण्यांना उत्तर देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ट्विटरवर लिहिले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.”

दरम्यान, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही बोम्मई यांच्या दोन्ही राज्यांमधील सीमावादावरील वक्तव्याचा निषेध केला.

तसेच, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर टीका केली. बोम्मई यांच्याविरोधात बोलण्याचे धाडस त्यांच्यात नसल्याचेही ते म्हणाले.

यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले सरकार महाराष्ट्राची एक इंचही जमीन कोणाच्याही हातात जाऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले. शिंदे म्हणाले की, "सीमाभागातील मराठी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्राचे एक इंचही पाणी जाऊ देणार नाही. 40 गावांचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे."

शिवाय, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद अनेक दशकांपूर्वी सुरु झाला. 1960 मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकची निर्मिती झाली तेव्हा सीमेवरील 865 गावे विलीन व्हावीत असा महाराष्ट्राचा दावा होता. तर दुसरीकडे, कर्नाटकने महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या 260 कन्नड गावांवर आपला अधिकार सांगितला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT