महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपला तरीही नेते तो का उकरून काढतात...!

कित्तूर-कर्नाटकातील (Kittur-Karnataka) सर्व जिल्ह्यांच्या विकासासाठी आता प्राधान्यही देण्यात येईल.
CM Basavaraj Bommai
CM Basavaraj Bommai Dainik Gomantak

कर्नाटक: मुख्यमंत्री (CM) बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी कित्तूर-कर्नाटक या विभागाच्या विकासासाठी विशेष टास्क फोर्स आणि पॅकेज देऊ असे आश्वासन दिले.गजेंद्रगड तालुक्यात हाळेकेरी या गावात एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) हा सीमावाद संपला आहे. परंतु महाराष्ट्रातील नेते सतत ते उकरून काढत आहेत. यामुळे मुंबई-कर्नाटक ला कित्तूर-कर्नाटक हे नाव देण्यात आले आहे. असे त्यांनी संगितले.

CM Basavaraj Bommai
कर्नाटक सरकारची मोठी घोषणा! गोव्यात उभारणार कन्नड भवन

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमावाद (Borderism) संपला आहे. आणि त्यावर तोडगाही निघाला आहे. तरी महाराष्ट्रातील जनता अद्यापही याच वादावरून झगडत आहे. यामुळे अनेक ज्येष्ठांच्या सल्ला घेऊन कित्तूर-कर्नाटक असे या भागाचे नामकरण करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

आमच्या सरकारने यापूर्वी हैदराबाद-कर्नाटक (Hyderabad) चे कल्याण-कर्नाटक असे नामकरण देऊन या भागाच्या विकासासाठी विशेष पॅकेज घोषित केले. कित्तूर-कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांच्या विकासासाठी आता प्राधान्यही देण्यात येईल, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com