Maharashtra ATS Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra ATS: पंजाबचा गँगस्टर सोनू खत्रीच्या तीन साथीदारांना अटक, एटीएसची कारवाई

तिघेही गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याच्या संपर्कात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पंजाबस्थित गुंड सोनू खत्रीच्या तीन साथीदारांना ठाण्यातून अटक केली आहे. पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्स (एजीटीएफ) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत एटीएसने रविवारी संध्याकाळी ठाण्यातील कल्याण येथून तीन आरोपींना अटक केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तिघेही गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याच्या संपर्कात होते.

शिवम सिंग, गुरुमुख सिंग आणि अमरदीप कुमार अशी तीन आरोपींची नावे आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांना मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे कारवाई करत ATS अधिकाऱ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी आंबिवलीच्या NRC कॉलनीत सापळा रचला होता. कालाचौकी आणि विक्रोळी युनिटमधील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एटीएसच्या पथकाने स्थानिक पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या मदतीने यादव नगर येथून आरोपींना अटक केले. तिघांवरही खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, स्फोटके असे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पंजाब पोलीस अनेक दिवसांपासून या गुन्हेगारांचा शोध घेत होते, परंतु त्यांचे ठिकाण सापडत नव्हते. यानंतर त्यांना पकडण्याची जबाबदारी पंजाब अँटी गँगस्टर टास्कर फोर्सकडे सोपवण्यात आली. हे तिन्ही आरोपी पंजाबमधील माखन सिंग हत्याकांडात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिन्ही आरोपी पंजाबचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे आरोपींना पंजाब पोलिस न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिन्ही गुन्हेगार बब्बर खालसा प्रमुख हरविंदर सिंग रिंडा आणि सोनू खत्री टोळीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिघांनीही नवांशहरमध्ये माखन सिंगची हत्या करून पळ काढला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT