Uddhav Thackeray & Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सोमवारी महत्वपूर्ण निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रात जूनमध्ये मोठी राजकीय उलाथापालथ झाली, शिवसेनेत फूट पडली आणि सत्तेत असलेले उद्धव ठाकरे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात सत्तेत आले. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष याचा निर्णय न्यायालयात पोहचला आहे. या सगळ्या प्रकरणासाठी सोमवारचा दिवस महत्वपूर्ण आहे. उद्या या प्रकरणाचा निर्णय होणार की प्रकरण खंडपीठाकडे सोपविले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगातही जी लढाई सुरु झालीय, त्यावर देखील न्यायालय काय आदेश देतं हेही पाहणं महत्वाचं असेल. याशिवाय सोमवारनंतर लगेच मंगळवारी निवडणूक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. कारण 23 ऑगस्टपर्यंत उद्धव ठाकरे गटानं आपलं म्हणणं मांडावं असं आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे उद्या काही महत्वपूर्ण निर्णय येतो तसेच, मंगळवारी काय निर्णय येतो का हे प्रकरण आणखी लांबणीवर पडतं याची उत्सुकता आहे.

काय आहेत महत्वाचे मुद्दे

उद्या निर्णय होणार की प्रकरण घटनापीठाकडे सोपवले जाणार

प्रकरण घटनापीठाकडे गेल्यास अधिक काळ लांबण्याची शक्यता

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कारवाईचा निर्णयाचे काय होणार?

निवडणूक आयोगातील निर्णयाचा उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाचा दिवस.

दरम्यान, सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. निवृत्तीआधी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवतायत का हे देखील उद्याच समजणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT