Ashadhi Ekadashi  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Ashadhi Ekadashi: टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू असल्याने पंढरी दुमदुमून गेली आहे. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने पेरण्या उरकून अनेकांनी पंढरीची वाट धरली.

Sameer Panditrao

पंढरपूर: ‘पावलो पंढरी वैकुंठ भुवनी!’ हा आत्मानंद सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू असल्याने पंढरी दुमदुमून गेली आहे. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने पेरण्या उरकून अनेकांनी पंढरीची वाट धरली.

सर्वच पालखी सोहळ्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या अधिक पाहायला मिळाली. पंढरपूरमध्ये विक्रमी सुमारे बारा ते पंधरा लाख भाविक आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० जन्मोत्सव महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होत आहे. त्यामुळे माउलींच्या सोहळ्यात वारकऱ्यांची गर्दी दरवर्षीच्या तुलनेत दीड ते दोन पट अधिक होती.

तसेच संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा असल्याने त्याही सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. सर्वच संतांच्या पालख्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढलेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालखी सोहळे पंढरीत दाखल होऊ लागलेत.

दर्शनरांग गोपाळपुरापुढे

चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पुंडलिक मंदिर, नामदेव पायरी, कळस दर्शन करून काही भाविकांनी पंढरीत मुक्काम केला आहे. आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडण्यात आले आहे. विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपुरापुढे गेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव यांचे पालखी सोहळे दाखल झाल्यानंतर गर्दी वाढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT