38 killed on Konkan railway line in 10 months Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway: दहा महिन्यांत रेल्वे रुळावर 38 जणांचा मृत्यू

रेल्वे रुळावरून निष्काळजीपणामुळे चालल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून काहीजण दारुच्या नशेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: राज्यात गेल्या दहा महिन्यांत कोकण रेल्वे रुळावर (Konkan Railway Line) एकूण 38 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये अज्ञातांची संख्या जास्त आहे. 38 जणांपैकी 20 जण अज्ञात व्यक्ती आहेत. कोकण रेल्वे रुळावर 38 जणांच्या मृत्यूंमध्ये कामगार तसेच परप्रांतियांची संख्या जास्त असल्याचे तपासकामात निष्पन्न झाले आहे.

ज्या मृतदेहांची ओळख पटलेली आहेत, त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करून संबंधित कुटुंबियांकडे सुपुर्द केले आहेत. रेल्वे रुळावरून निष्काळजीपणामुळे चालल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून काहीजण दारुच्या नशेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जूनमध्‍ये सर्वाधिक बळी

रेल्वे रुळावर सर्वाधिक मृत्यू हे जूनमध्ये झाले आहेत. एकूण 10 जणांचा मृत्‍यू झाला. जुलै महिन्यात 6, मार्चमध्ये 4, एप्रिलमध्ये 5, जानेवारी, मे आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी 3, फेब्रुवारीमध्ये 1, तर ऑगस्ट महिन्यात एकाचाही मृत्यू झाला नाही. सुरवातीच्या सहा महिन्यांत 27 जणांचा मृत्यू झाला होता. यात 14 जण अज्ञात आहेत. 2020 मध्ये मृतांची संख्या कमी होती. आता या संख्येत वाढ झालेली आहे, अशी माहिती कोकण रेल्वे पोलिसांकडून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT