Wanindu Hasaranga X/ICC
क्रीडा

Hasaranga on no-ball controversy: अटीतटीच्या लढतीत नो-बॉलचा वाद; हसंरगा पंचाना म्हणाला, 'जमत नसेल, तर दुसरं काम करा'

Pranali Kodre

Wanindu Hasaranga on no-ball controversy during Sri Lanka vs Afghanistan 3rd T20I Match:

बुधवारी (21 फेब्रुवारी) अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध तिसरा टी२० सामना अवघ्या ३ धावांनी जिंकला आणि मालिकेत व्हाइटवॉश टाळला. मात्र, या सामन्यादरम्यान एक मोठा वाद झाला असून त्यावर श्रीलंकेचा कर्णधार वनिंदू हसरंगाने खळबळजनक वक्तव्यही केले आहे.

त्याने या सामन्यातील पंच लिंनड हनिबल यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून म्हटले की त्यांनी दुसरे काम करायला हवे. या सामन्यातील अखेरच्या षटकात त्यांनी उंच फुट टॉसवर नो-बॉल न देता त्याला अधिकृत चेंडूचा करार दिल्याने हसरंगाने राग व्यक्त केला आहे.

झाले असे की अखेरच्या तीन चेंडूत श्रीलंकेला विजयासाठी 11 धावांची गरज होती. त्यावेळी अखेरचे षटक अफगाणिस्तानकडून वफादार मोमंद टाकत होता, तर कामिंदू मेंडीस फलंदाजी करत होता

मोमंदने या षटकात टाकलेला चौथा चेंडू खेळण्यासाठी कमिंदू मेंडिस क्रिजच्या बाहेर आलेला असला, तरी चेंडू टप्पा न पडला त्याच्या कमरेच्या वर होता. तो चेंडू मेंडिसच्या बॅटलाही लागला नाही. त्यामुळे मेंडिसला वाटले होते की त्यावेळी स्क्वेअर-लेगला असलेले पंच लिंडन हनिबल हा नो-बॉल देतील.

मात्र, त्यांनी हा चेंडू वैध ठरवला. ते पाहून अनेकजण चकीत झाले होते. मेंडिसने रिव्ह्युसाठीही विचारणा केली. मात्र फलंदाजाला अशाप्रकारासाठी रिव्ह्यू घेता येत नाही. तसेच मैदानावरील पंचही विकेटशिवाय नो-बॉलसाठी रिव्ह्यू घेत नाहीत.

आयसीसीच्या नियमानुसार गोलंदाजाने टाकलेला चेंडूची उसळी जर फलंदाजाच्या कंबरेच्या वर असेल, तर तो चेंडू नो-बॉल देण्यात येतो. मात्र, पंचांनी तो चेंडू वैध ठरवल्याने श्रीलंकेसमोर 2 चेंडूत 11 धावा असे समीकरण तयार झाले. त्यानंतर श्रीलंकेला विजय मिळवता आला नाही आणि त्यांना 3 धावांनीच पराभव स्विकारावा लागला.

अवघ्या 3 धावांनी पराभव मिळाल्याने त्या चेंडूचे महत्त्व वाढले होते. दरम्यान, सामन्यानंतर हसरंगाने त्याची नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

हसरंगा म्हणाला, 'अशाप्रकारच्या गोष्टी आंतरराष्ट्रीय सामन्यात होणे चूकीचे आहे. जर चेंडू कंबरेच्या आसपास असता, तर काही समस्या नव्हती. पण चेंडूची उंची खूप होती. जर अजून थोडा चेंडू वर असता, तर तो चेंडू फलंदाजाच्या डोक्यालाही लागला असता.'

'जर तुम्ही ते पाहू शकत नसाल, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे पंच योग्य नाहीत. त्यांनी दुसरे काहीतरी काम करणेच योग्य असेल.'

त्याचबरोबर फलंदाजाला नो-बॉलसाठी रिव्ह्यू घेता न येण्याबद्दलही हसरंगाने प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, 'आधी अशी परिस्थिती होती की तुम्ही अशावेळी रिव्ह्यू घेऊ शकत होता, पण आयसीसीने तो नियम हटवला. आमच्या फलंदाजाने रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला होता. जर थर्ड अंपायर पायाचा नो-बॉल पाहू शकतात, तर त्यांनी अशाप्रकारचे नो-बॉलही पाहायला हवेत. ते असं का करत नाहीत, यामागे काही कारण नाहीये. मला माहित नाही, त्यावेळी पंचांच्या डोक्यात काय विचार होता.'

दरम्यान, या मालिकेतील पहिले दोन सामने श्रीलंकेने जिंकले होते. त्यामुळे त्यांनी ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT