Rishabh Pant - Rohit Sharma X
क्रीडा

Rishabh Pant: 'क्रिकेट सोडशील तेव्हाच तुला...', ऐतिहासिक गॅबा कसोटी जिंकल्यावर पंतला काय म्हणालेला रोहित?

Pranali Kodre

Rishabh Pant opened up about Rohit Sharma words after Team India Gabba win against Australia:

भारतीय क्रिकेट संघाने आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. यातील एक म्हणजे जानेवारी 2021 मध्ये ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला विजय. 2020-21 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता.

या दौऱ्यात भारताने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना ब्रिस्बेनवरील गॅबा मैदानात मिळवला होता. यासह भारताने तीन दशके ऑस्ट्रेलियाचा गॅबावर अपराजीत राहण्याच्या विक्रमाला धक्का दिला होता.

याबरोबरच भारताने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यामुळे भारतासाठी हा विजय खास होता. ब्रिस्बेन कसोटीच्या विजयात ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो या सामन्याचा सामनावीरही ठरला होता.

दरम्यान, या विजयाला आता तीन वर्षे पूर्ण झाले असून पंतने याबद्दल स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंत म्हणाला, मला लक्षात आहे की रोहित शर्माने काय म्हटले होते. मला खूप लोकांनी शुभेच्छा दिल्या, पण मला रोहितने म्हटलेलं चांगलं लक्षात आहे. तो माझ्या रिऍक्शन पाहात होता. सर्वजण खूश होते. पण तो बाकीच्यांसारखं मी त्याला उत्साहित दिसत नव्हतो.

'तो मला म्हणाला, 'मला वाटत नाही की तुला तू काय केलं आहे, याची कल्पना आहे.' मी त्याला म्हटलं 'आपण एक सामना जिंकलोय आणि दुसऱ्यांदा मालिका जिंकलोय.' त्यानंतर रोहित म्हणाला, 'जेव्हा तू क्रिकेट सोडशील, तेव्हा तुला या खेळीचं महत्त्व समजेल, तुला माहित नाहीये की तू काय केलं आहेस."

पंत पुढे म्हणाला, 'त्यानंतर मला जाणवलं की मी काय केलं होतं.'

या सामन्यापूर्वीच भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली मुलीच्या जन्मासाठी मायदेशी परतलेला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करत होता. तर अनेक वरिष्ठ खेळाडू दुखापतग्रस्त होते. त्यामुळे या सामन्यासाठी युवा खेळाडू भारतीय संघाकडून खेळत होते.

ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी दुसऱ्या डावात ३२८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आधी शुभमन गिल (91) आणि चेतेश्वर पुजाराने (56) सुरुवात करून दिली होती.

त्यानंतर पंतने आक्रमक खेळताना अखेरच्या दिवशी नाबाद 89 धावा केल्या होत्या आणि भारताला विजय मिळवून दिला होता. त्याने 97 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लाँग-ऑफला चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

SCROLL FOR NEXT