Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test Series ANI
क्रीडा

IND Vs ENG: डेब्यू टेस्ट सीरीजमध्ये 'ध्रुव' चमकला; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय यष्टीरक्षक

Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने रांची कसोटीत पाच गडी राखून शानदार विजय नोंदवला.

Manish Jadhav

Dhruv Jurel First Wicket Keeper Record Debut Test Series:

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने रांची कसोटीत पाच गडी राखून शानदार विजय नोंदवला आणि मालिकाही जिंकली. ध्रुव जुरेल रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला, ज्याच्या कारकिर्दीतील हा फक्त दुसरा कसोटी आणि आंतरराष्ट्रीय सामना होता.

याआधी त्याला राजकोट कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पदार्पणाच्या डावात 46 धावा केल्या मात्र दुसऱ्या डावात फलंदाजी केली नाही. त्यानंतर रांची कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 95 धावांची खेळी करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आणि धावसंख्या तीनशेच्या पुढे नेली.

ध्रुव तीन डावात चमकला

दरम्यान, रांची कसोटीच्या दुसऱ्या डावातही टीम इंडिया 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली होती, तेव्हा एकवेळ जडेजा आणि सर्फराजच्या लागोपाठ विकेट पडल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. तिथून ध्रुव जुरेलने शुभमन गिलला साथ देत टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. त्याने 39 धावांची नाबाद खेळी खेळली. आतापर्यंत त्याने तीन डावात 87 च्या सरासरीने 175 धावा केल्या आहेत. रांची कसोटीतही तो 'सामनावीर' म्हणून निवडला गेला. यासह त्याने आपले नाव रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट केले आहे.

22 वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय यष्टीरक्षक

यासह, ध्रुव जुरेल 22 वर्षात पदार्पणाच्या कसोटी मालिकेत 'सामनावीर' पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला. गेल्या 22 वर्षांत, एमएस धोनी, ऋषभ पंत सारखे महान यष्टिरक्षक फलंदाज टीम इंडियासाठी आले आहेत, परंतु त्यांच्या पदार्पणाच्या मालिकेत कोणालाही असे करता आले नाही. आता ध्रुव जुरेल हा गेल्या 22 वर्षात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

घरच्या मैदानावर भारताचा सलग 17 वा टेस्ट विजय

टीम इंडियाने 2012 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाने 2012 पासून आतापर्यंत 17 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. मायदेशात टीम इंडियाचा हा शानदार रेकॉर्ड आहे. तर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिली कसोटी मालिका गमावली आहे. भारतासाठी आतापर्यंतच्या संपूर्ण मालिकेत युवा खेळाडूंची कामगिरी पाहायला मिळाली. यशस्वी जयस्वालने दोन द्विशतकांसह 600 हून अधिक धावा केल्या आहेत. तर ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांनी पदार्पणानंतर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

Poonam Pandey: पूनम पांडेच्या निशाण्यावर बडे क्रिकेटर्स? 'मेसेज' करून काय मागतात? स्वतःच केला खुलासा

Taliban New Penal Code: बायकोला हाडं तुटेपर्यंत मारणं आता 'कायदेशीर', तालिबानचा नवा क्रूर कायदा; अफगाणिस्तानात पुन्हा महिलांच्या हक्कांची पायमल्ली

Ranji Trophy: जम्मू-काश्मीर संघाचा ऐतिहासिक विजय, बंगालवर मात करून पहिल्यांदाच स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT