INDW vs BANW Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs BANW, T20I: टीम इंडियाने गमावली व्हाईटवॉशची संधी! अखेरच्या सामन्यात बांगलादेशची बाजी; हरमनची झुंज व्यर्थ

INDW vs BANW, T20I: तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाला बांगलादेशविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्याने व्हाईटवॉश देण्याची संधी हुकली.

Pranali Kodre

Bangladesh Women vs India Women, 3rd T20I : भारतीय महिला संघ विरुद्ध बांगलादेश महिला संघात गुरुवारी टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी२० सामना पार पडला.ढाकाला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला 4 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पण पहिले दोन सामने जिंकले असल्याने भारताने 2-1 अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.

या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी 103 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग बांगलादेशने 18.2 षटकातच 6 विकेट्स गमावत पूर्ण केले.

बांगलादेशची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. बांगलादेशने 16 धावात 2 विकेट्स गमावले होते. पण नंतर शमिमा सुलताना आणि कर्णधार निगर सुलताना यांनी डाव सावरला. मात्र बांगलादेशने 60 धावा पार केल्यानंतर निगर 14 धावांवर बाद झाली. पाठोपाठ शोरना अक्तरही 2 धावांवर बाद झाली.

त्यानंतर सुलताना खातुनने शमिमाला साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र 85 धावांवर दोघीही लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्या. सुलताना खातुनला 12 धावांवर देविका वैद्यने बाद केले. तर शमिमा 42 धावांवर धावबाद झाली.

यानंतर मात्र रितू मोनी आणि नाहिदा अक्तर यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही आणि त्यांनी बांगलादेशचा विजय निश्चित केला. मोनीने नाबाद 7 धावा केल्या, तर नाहिदा १० धावांवर नाबाद राहिली.

भारताकडून मिन्नू मणी आणि देविका वैद्य यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच जेमिमा रोड्रिग्सने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतानेही स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. पण त्यानंतर जेमिमा रोड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीतने डाव सांभाळला.

मात्र खेळपट्टीवर स्थिरावली असतानाच जेमिमा 28 धावांवर बाद झाली. त्यामुळे तिची हरमनप्रीतबरोबर झालेली 42 धावांची भागीदारीही तुटली. पण नंतर यास्तिकाने हरमनप्रीतला साथ दिली. मात्र हरमनप्रीत 41 चेंडूच 40 धावांवर असताना बाद झाली. त्यांचीही 31 धावांची भागीदारी झाली होती.

यानंतर मात्र यास्तिकाही 12 धावांवर बाद झाली. तसेच भारताने हरमनप्रीतची विकेट गमावल्यानंतर 11 धावांत पुढील 5 विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारताला 20 षटकात 9 बाद 102 धावाच करता आल्या.

बांगलादेशकडून राबेया खानने 3 विकेट्स घेतल्या, तसेच सुलताना खातुनने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर नाहिदा अक्तर, फाहिमा खातुन आणि शोरना अक्तर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT