Goa Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shack: परवाने मिळाले, तरीही अडथळे

Goa Shack Policy: अटींच्या पूर्ततेचे आव्हान : 353 जणांना सोडतीद्वारे शॅकवाटप

दैनिक गोमन्तक

Goa Shack Policy: बहुप्रतिक्षित शॅकवाटप सोडतीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. सोडतीच्या माध्यमातून राज्यातील एकूण 353 शॅक्सचे वाटप करण्यात आले.

असे असले तरी, शॅक परवाने मिळालेल्यांची अडथळ्यांची शर्यत आजपासून सुरू झाली आहे.

यंदा शॅक व्यावसायिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सयंत्र त्यांना बसवावे लागणार आहे. शिवाय शॅकची जागा सरकारी यंत्रणेकडून आखून घ्यावी लागेल.

शॅकचे काम सुरू करण्यापूर्वी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घ्यावी लागणार असून बांधकाम पूर्ण झाल्यावर परवाना घ्यावा लागेल.

किनाऱ्यावरील शॅकसाठी परवाने देण्याचा सोपस्कार पर्यटन खात्याने पार पाडला असला, तरी आता शॅक उभारणीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

जमिनीपासून 1 मीटर उंचीवर शॅक उभारावा लागेल. आजपर्यंत शॅक परवाने कोणाला मिळणार, हे स्पष्ट झाले नसल्याने या साहित्यासाठी कोणी गुंतवणूक केलेली नव्हती.

आता परवाने कोणाला मिळाले, ते स्पष्ट झाल्याने उद्यापासून त्यांना साहित्याची जमवाजमव करावी लागणार आहे. त्यातही पोलाद किंवा लोखंडाचा केवळ 30 टक्के वापर करता येणार आहे.

उर्वरित उभारणी पारंपरिक साहित्याने करावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पारंपरिक साहित्य मिळवण्यासाठी उद्यापासून परवानाधारकांना धावाधाव करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

SCROLL FOR NEXT