साखळी: 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा ही येणाऱ्या पिढीसाठी व विकसित भारतासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
परीक्षा म्हणजे ताण घेण्याचा क्षण नसून तो एक उत्सव आहे. त्यांचा संदेश विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती नष्ट करणारा आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमावेळी व्यक्त केले. साखळी रवींद्र भवनात मुख्यमंत्र्यांनी सुमारे ८०० विद्यार्थ्यांसह हा 'लाईव्ह' कार्यक्रम पाहिला.
साखळीच्या नगराध्यक्ष सिध्दी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, शिक्षण संचालक शैलेंद्र शिंगडे, उपसंचालक मनोव साचईकर, साखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिगुलकर, गोवा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रुपेश ठाणेदार, भाग शिक्षणाधिकारी लीना कळंगुटकर, भाजप उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर व इतरांची उपस्थिती होती.
अनोखी संकल्पना
'परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची ही आठवी आवृत्ती असून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणासाठीच प्रेरित व उत्साहीत न करता सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या परीक्षांसाठी आत्मविश्वास देणे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना व कल्पकता सर्वात अनोखी महत्वाची आहे.
त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा व विविध पैलूंवर केलेले मार्गदर्शन आजच्या विद्यार्थ्यांना तणावातून बाहेर काढण्यासाठी लाभदायी ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.