Hari Naik Gavkar Gomantak Digital Team
गोवा

Bicholim News : केळबाई’ मंदिर खुले करा!

डिचोली मामलेदारांकडून देवस्थान समितीला निर्देश

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News : मये येथील श्री केळबाई मंदिर ‘बंद’ प्रकरणाची देवालयाचे प्रशासक तथा डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांनी अखेर भाविकांकडून आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मंदिराचे दार उघडा, असे निर्देश त्यांनी आज श्री माया केळबाई पंचायतन देवस्थान समितीला दिले आहेत.

आज सायंकाळी कारणे दाखवा नोटीसही त्यांनी देवस्थान समितीला जारी केली आहे. निर्देशीत केलेल्या मुदतीत मंदिर खुले करण्यास टाळाटाळ झाल्यास देवस्थान कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे नोटिशीत स्पष्ट केले आहे. श्री केळबाई देवीचे मंदिर ४८ तासांच्या आत खुले करावे, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांसह भाविकांनी देताच मंदिर खुले करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाविकांच्या भूमिकेकडे लक्ष

दिलेल्या मुदतीत मंदिर उघडण्यास प्रशासनाला अपयश आले, तर उत्सव साजरा करुन मंदिर उघडण्यात येईल, असा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांसह भाविकांनी दिला आहे. भाविकांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वीच प्रशासनाकडून मंदिर खुले करण्यात येते की नाही, ते मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

मामलेदारांना निवेदन

मंदिर ‘बंद'' प्रश्‍नावरून रविवारी हिंदुत्ववादी संघटनांच्या मार्गदर्शनाखाली मये येथे स्थानिक भाविकांची एक सभा झाली होती. या सभेत ठरल्याप्रमाणे सोमवारी डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांना मागणीचे निवेदन दिले. मामलेदारांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोगळ खून प्रकरणी मोठी कारवाई! हलगर्जीपणामुळे पोलिस निरीक्षकाची बदली, एएसआय निलंबित; संशयिताने दिली साक्षीदारांना धमकी

Rashi Bhavishya: वेळ बदलतेय! नशिबाची चक्रे फिरणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस आहे खास

Opinion: 'लायब्ररिअन म्हणाला, आमच्याकडे कोकणी भाषेची फक्त 900 पुस्तकं आहेत'! विचारांच्या बाजारपेठेत

Mahatma Gandhi: अन्यायकारक दरडोई ‘कर’ सत्याग्रहामुळे इंडियन रिलीफ ऍक्ट, १९१४मार्फत रद्द केला गेला; गांधीजींचे समाजशास्त्र

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

SCROLL FOR NEXT