Court Dainik Gomantak
गोवा

Mapusa Court: नागेश गवळी खुनी हल्ला प्रकरण; पुराव्याअभावी संशयितांची निर्दोष सुटका

Goa Crime News: २०१८ साली मे महिन्यात ही घटना घडली होती. क्षितीज गिरीश गडेकर आणि नागेश गवळी यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरुन वाद झाला.

Pramod Yadav

म्हापसा: नागेश गवळी खुनी हल्ला प्रकरणातील सर्व संशयितांची पुराव्याअभावी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. कैलासनगर, अस्नोडा येथे २०१८ साली ही घटना घडली होती. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती.

क्षितीज गिरीश गडेकर (डिचोली), साजद निजामुद्दीन करोल (डिचोली), निकेश पांडुरंग कवळेकर (पिळगाव) दिवंगत सिद्धार्थ संतोष परवार (पिळगाव) आणि अपूर्वा सोनू होबळे (डिचोली) यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

२०१८ साली मे महिन्यात ही घटना घडली होती. क्षितीज गिरीश गडेकर आणि नागेश गवळी यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरुन वाद झाला. दरम्यान, संतापलेल्या क्षितीज या संशयिताने नागेशचा शोध घेत त्याचे घर गाठले. नागेशला संशयिताने गराडा घातला आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी गवळी यांनी म्हापसा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करुन संशयितांना अटक केली. पोलिसांनी म्हापसा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मात्र, खटल्यावेळी संशयितांविरोधात पुरावे सादर करण्यास सरकारी पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे संशयितांची निर्दोष सुटका करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

Astrology: लग्नात अडचणी येतायेत? 'हे' अशुभ ग्रह ठरतात अडथळा, काय सांगते तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांची स्थिती? जाणून घ्या

Amol Muzumdar: ‘..हा पुढचा सचिन तेंडुलकर'! पदार्पणात 260 धावांची खेळी, हिटमॅन रोहितला दिली संधी; विश्वचषकामागचा 'नायक'

Goa Politics: 'स्थलांतरित-समर्थक' सरकार दीड वर्षात पडणार, RGP स्थापन करणार पुढचे सरकार! मनोज परब यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT