Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: लोकसभा निवडणूक निकालापेक्षा धार्मिक सलोखा राखणे महत्त्वाचे

विजय सरदेसाई : मतांच्या ध्रुवीकरणाचे सरकारचे प्रयत्न

दैनिक गोमन्तक

Vijai Sardesai: निवडणुका येतील आणि जातील, सरकारे येतील आणि जातील; पण धार्मिक सलोखा राखला पाहिजे. गोवावासी म्हणून आपले ते कर्तव्य आहे.

निवडणुकीत काय निकाल लागणार त्यापेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

गोव्यात हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी सध्या काही ठिकाणी हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहेत त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी हे वक्तव्य केले आहे.

मतदारांच्या एका गटाचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिक सलोखा जाणूनबुजून बिघडवला जात आहे. हे पाहणे दुःखदायक आहे.

एक हिंदू या नात्याने गोयकारांनी हिंदू कसे असावे किंवा हिंदू धर्माचे पालन कसे करावे हे सांगण्यासाठी आम्हाला गोव्याच्या बाहेरील लोकांची गरज नाही, असे मला ठामपणे सांगायचे आहे.

शतकानुशतके आम्ही आमच्या धर्माचे आणि मंदिरांचे रक्षण केले आहे. आम्हाला काही शिकवण्यासाठी बाहेरच्या लोकांची गरज नाही, असे ते म्हणाले.

धार्मिक सहिष्णुता आणि शांततापूर्ण अस्तित्वाला मूर्त रूप देणारी भारताची कल्पना गोव्याने स्वीकारली आहे,

इतर भारतापेक्षा अधिक उत्कटतेने, प्रामाणिकपणे आणि सत्याने गोव्याने ही भूमिका निभावली आहे. आपण अनेकदा देशाच्या इतर भागांमध्ये दंगली पाहतो. गोव्यात अशाप्रकारचे जातीय तणाव आणि शत्रुत्व अस्तित्वात नाही, असेही सरदेसाई पुढे म्हणाले.

‘संस्कृती महत्त्वाचीच’

लईराई देवी असो किंवा मिलाग्रीस सायबिण असो, त्या आपल्या देवी आहेत आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.

माझ्यासाठी, आपल्या संस्कृतीबद्दल जागरूकता वाढवणे आणि धार्मिक सौहार्दाला प्रोत्साहन देणे हे कोणत्याही निवडणुकीपेक्षा महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी मी मनापासून योगदान देईन, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आरोन जॉर्जनं धू-धू धुतलं, मग दीपेश-कनिष्कनं गारद केलं, टीम इंडियानं पाकिस्तानला 90 धावांनी लोळवलं VIDEO

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

SCROLL FOR NEXT