Goa Dainik Gomantak
गोवा

वाचनाने जीवन 'समृद्ध' होते!

त्याचबरोबर सांस्कृतिक अनुबंध टिकवुन ठेवण्याची गरज असल्याचेही राज्यपाल आर्लेकर म्हणाले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : वाचन हे जीवन समृद्धीसाठी महत्वाचे आहे. वाचनाची सुरवात स्वताच्या घरातुन व्हावी. घरात पुस्तके आली पाहिजेत. वाचन होत नसेल तर पुस्तकांचा उपयोग तो काय असे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेन्द्र आर्लेकर यानी प्रतिपादन केले. प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांच्या गौरव समारंभात बोलताना राज्यपाल आर्लेकर यानी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.

प्रा. अडसुळ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असुन त्याचे साहित्य (Literature), लेखन, भाषा यावर चांगले प्रभुत्व असल्याचे त्यानी सांगितले. माणुस लीन असायला पाहिजे त्यामुळे तो चांगले जिवन जगू शकतो. प्रा. अडसूळ यांचा वारसा त्यांच्या विद्यार्थ्यांनी टिकवुन ठेवला पाहिजे. त्याचबरोबर सांस्कृतिक अनुबंध टिकवुन ठेवण्याची गरज असल्याचेही राज्यपाल आर्लेकर म्हणाले.

प्रा. अडसूळ यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे. त्यानी शिक्षकी पेशाला योग्य न्याय दिल्याचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सांगितले. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते समाजासाठी देण्याची भावना मनावर रुजविण्याचे काम प्रा. अडसूळ यानी केले असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची गरज आहे.त्यासाठी प्रा. अडसूळ यांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रा. अडसूळ यानी विद्यार्थ्यांना दिशा दाखवली असे रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक म्हणाले.

विनम्रता, विनयशिलता, बोलताना संवेदनशीलता, व आत्मचिंतन हे एखाद्या व्यक्तीमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र सद्या जग वाचन संस्कृतीपासुन दूर जात असल्याचे प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यानी सत्काविनम्रता, विनयशिलता, बोलताना संवेदनशीलता, व आत्मचिंतन हे एखाद्या व्यक्तीमध्ये असणे गरजेचे आहे. मात्र सद्या जग वाचन संस्कृतीपासुन दूर जात असल्याचे प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यानी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

गोव्यात (Goa) आपला वेगवेगळे स्वातंत्र्यसैनिक व इतर महनीय व्यक्तींचा सहवास लाभला हे माझे भाग्य समजतो असेही प्रा. अडसूळ म्हणाले. माणसाने पणती सारखे जगाला प्रकाश देण्याचे काम करावे असे आवाहनही त्यानी या प्रसंगी केले. या कार्यक्रमात त्यांच्या कृष्णानुबंध व सृजनवेध या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. विनय कामत यानी मानपत्राचे वाचन केले तर प्रभाकर ढगे यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सौ. मेघना कुरुंदवाडकर यानी आभार व्यक्त केले.

प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांना मानपत्र प्रदान करताना मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेन्द्र आर्लेकर, दामू नाईक, संध्या कामत व मान्यवर. दुसऱ्या फोटोत पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेन्द्र आर्लेकर, रवीन्द्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, सदस्य सचीव संध्या कामत, सौ. मेघना कुरुंदवाडकर, प्रा. श्रीकृष्ण अडसूळ व सौ अडसूळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT