Goa Tourism Dainik Gomatnak
गोवा

Viral Post: "चार्म गेला, सर्वात वाईट परिस्थिती"! गोवा पर्यटनाबद्दल रंगली चर्चा; सोशल मीडियावर दिली कारणांची लिस्ट

Goa Tourism: ख्रिसमसपासून वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्त्याने गोव्यात गर्दी होत आहे. मुंबई गोवा महामार्ग गाड्यांनी भरलेला आहे.

Sameer Panditrao

ख्रिसमसपासून वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्त्याने गोव्यात गर्दी होत आहे. मुंबई गोवा महामार्ग गाड्यांनी भरलेला आहे. असे वातावरण असताना रेडिट या प्लँटफॉर्मवर एका युजरने गोव्याबद्दल मत व्यक्त केले आहे ज्यावर जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. यात त्याने पर्यटन, टॅक्सी या विषयांवर मत मांडले आहे.

तो युजर पोस्टमध्ये म्हणतो कोविडनंतर गोव्याची मजा नाहीशी होत चालली आहे. २०२५ मधली या वर्षीची परिस्थिती आतापर्यंतची सर्वात वाईट वाटत आहे. याबाबत त्याने काही कारणे नमूद केली आहेत.

१.सर्वत्र फसवणूक, विशेषतः पर्यटकांना लक्ष्य केले जात आहे

२. काही लोकांचे उद्धट वर्तन

३. टॅक्सी माफियामुळे कमी अंतराचा प्रवासही त्रासदायक आणि खूप महाग झाला आहे

https://www.reddit.com/r/goatravel/s/lyj4bDG8TM

४. अन्नपदार्थ प्रचंड महाग झाले आहेत, पण त्यांची गुणवत्ता किमतीच्या तुलनेत अजिबात चांगली नाही

५. सामान्य हॉटेल्समध्येही राहण्याचा खर्च वाढला आहे

६. एका क्लबमधील आगीची घटना आणि अनेक क्लब बंद झाल्यामुळे, उरलेली नाइटलाइफही संपुष्टात आली आहे

७. दूरच्या राज्यांतून येणाऱ्या लोकांसाठी विमानाची तिकिटे अवास्तव महाग झाली आहेत

ही कारणे देऊन तो म्हणतो की, जे ठिकाण एकेकाळी शांत, स्वागतार्ह आणि मजेदार वाटायचे, ते आता तणावपूर्ण, महाग आणि निरुत्साहपूर्ण वाटते. ज्या गोव्याच्या प्रेमात लोक वर्षांपूर्वी पडले होते, ते आता अस्तित्वात नाही असे वाटते — किमान या हंगामात तरी नाही.

यावर अनेक लोकांनी चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही स्थानिकांनी त्याचे मुद्दे खोडूनही काढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

AAP Goa: आतिशींकडे पुन्हा राज्य प्रभारीपद, आम आदमी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT