Panjim Smart City Mission Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City Mission: पणजीत पुढील आठवड्यात धावणार 22 ईव्ही बसगाड्या

उल्हास तुयेकर: योजनेला उत्तरेतून प्रतिसाद नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Smart City Mission: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कदंब परिवहन महामंडळाला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या 22 ईव्ही बसगाड्या पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहेत.

राजधानीतील सात मार्गांवर या बसगाड्या धावणार आहेत, तर दुसरीकडे महामंडळाने सुरू केलेल्या ‘माझी बस योजने’ला उत्तर गोव्यातून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

तुयेकर म्हणाले, गेल्या एक महिन्यापूर्वी स्मार्ट सिटीसाठी बसगाड्या आल्या होत्या, त्यावेळी रस्त्यांची कामे सुरू होती. काही रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात या बसगाड्या सुरू होतील.

महामंडळाकडे 200 बसगाड्यांचा तुटवडा आहे. ग्रामीण भागात पाच बसगाड्या चालतात, त्याठिकाणी दोनच बसगाड्या आहेत. त्याशिवाय बाह्य राज्य मार्गावरील बसगाड्यांची संख्याही कमी झालेली आहे. शाळांना बसगाड्यांची आवश्‍यकता आहे. 15 वर्षे झालेल्या बसगाड्या भंगारात काढलेल्या आहेत.

100 इलेक्ट्रिक बसगाड्या येणे बाकी आहेत, त्यांच्या बॅटरी न आल्याने त्या येण्यास विलंब झाला आहे. निविदा प्रक्रियेनुसार पुढील डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापर्यंत दीडशे बसगाड्या मिळतील.

महामंडळाने सुरू केलेल्या ‘माझी बस’ योजनेत आत्तापर्यंत 66 खासगी बसगाड्या जोडल्या गेल्या आहेत. सर्व बसगाड्या दक्षिण गोव्यातील आहेत, उत्तर गोव्यात खासगी बस योजनेतून प्रतिसाद कमी मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT