M R Ramesh Kumar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

M R Ramesh Kumar: वायुप्रदूषणाचा निसर्गावर विपरित परिणाम

तज्ज्ञांचे मत : गांभीर्याने पाहण्याची गरज; यंदा पर्जन्यमानात झाली 9 टक्क्यांनी घट

दैनिक गोमन्तक

M R Ramesh Kumar: राज्यात सकाळी पावसाळा, दुपारी उन्हाळा, रात्री हिवाळा असा प्रकार सुरू आहे. गेल्या काही वर्षांतील गोव्यातील हवामान पाहता मोठ्या प्रमाणात बदल जाणवू लागले आहेत. राज्यातील तापमानाचा पारा यंदा 39 अंशापर्यंत गेला. यंदा राज्यात पावसात 9 टक्क्यांनी घट झाली. हवामान अभ्यासक तसेच काही शास्त्रज्ञांच्या मते राज्यातील वायुप्रदूषण हेदेखील महत्त्वाचे कारण आहे.

नोव्हेंबरच्या सुरवातीला काही प्रमाणात थंडी सुरू झाली. त्यात ढगाळ वातावरण, पावसामुळे थंडीही गायब झाली. राज्यात एकाच दिवशी 6 इंचाहून अधिक पाऊस बरसला व मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात झाली तर पणजी जलमय होते. तर एकेदिवशी 1 मि.मी. पाऊसदेखील पडत नाही. हे बदल पाहता आताच सावध होणे गरजेचे आहे.

तापमानवाढ चिंताजनक

गोवा राज्य हे समुद्रकिनाऱ्यालगत असलेले राज्य आहे. त्यामुळे उन्हाळ्यात 34 अंश सेल्सिअस तापमान हे सामान्य तापमान मानले जाते. मात्र, मागील साठ वर्षांचा हवामानाचा विचार करता राज्यातील तापमानात 0.5 अंश ते दोन अंश सेल्सिअस वाढ प्रत्येक वर्षी होत आहे. ही प्रत्येकासाठी चिंतेची बाब आहे.

"सततच्या हवामान बदलास वायुप्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे. हरित गृह (ग्रीन हाऊस) सोबतच वाढलेल्या वाहतुकीमुळे कार्बनडायऑक्सायडचे प्रमाण वाढल्याने राज्यात सतत हवामान बदल दिसतो."

- एम.आर. रमेश कुमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT