पणजी: होणार... होणार अशी चर्चा असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 'अटल' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असणार आहे.
दिवंगत मंत्री रवी नाईक यांनी तिसऱ्या जिल्ह्याची संकल्पना मांडली होती. त्यांना फाँडा येथे मुख्यालय ठेवून तिसरा जिल्हा आकाराला आणायचा होता. आता सरकारने सर्वपक्षीय बैठकीत तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीला अंतिम रूप दिले आहे. मात्र त्यात फॉडा तालुका नसेल.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार या तिसऱ्या जिल्ह्यात धारबांदोडा, सांगे, केपे व काणकोण तालुक्यांचा समावेश असेल. प्रशासनाचे विकेंद्रीकरण व जनतेला जलद सेवा देण्यासाठी हा तिसरा जिल्हा उपयोगी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचे चंद्रपूर असे नामकरण केले जाण्याची शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती. तसेच, या जिल्ह्याचे मुख्यालय कुडचडे येथे उभारले जाऊ शकते, अशीही चर्चा होती. दरम्यान, या दोन्ही शक्यता आता समाप्त झाल्या आहेत.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मात्र तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी घाई केल्याचे म्हटले आहे. "तिसऱ्या जिल्हयाला काँग्रेसचा विरोध नाही परंतु योग्य अभ्यास करून निर्णय व्हायला हवा. याबाबत स्थापन केलेल्या समितीचा अहवाल सरकारने उघड करावा", असे युरी आलेमाव म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.