पणजी: काही आठवड्यांपासून चर्चेत असलेली लहान मुलांच्या अपहरणाच्या प्रयत्नांची तिन्ही प्रकरणे ही खोटी असल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी राहुल गुप्ता स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या तपासानंतर ही प्रकरणे केवळ कल्पना विलासातून केलेला बनाव असल्याचे सांगत पोलिसांनी औपचारिक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
ऑक्टोबर ६ ते २६ या कालावधीत वाळपई, डिचोली आणि पणजी पोलीस स्थानकांत तिन्ही ठिकाणी मुलाच्या अपहरणाच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. परंतु साक्षीदारांचे जबाब, मुलांचे निवेदन आणि पुरावे तपासल्यानंतर ही प्रकरणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाळपई पोलीस स्थानकात दोन अनोळखी व्यक्ती पांढऱ्या कारमधून १२ वर्षीय मुलाला पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या चौकशीत कोणताही पुरावा न मिळाल्याने, स्थानिक साक्षीदारांनीही असा प्रकार घडल्याचे नाकारले.
डिचोलीत १३ वर्षीय मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर चौकशी केली असता, त्यानेच कबुली दिली की, ही गोष्ट त्याने अभ्यासाच्या दडपणापासून सुटका मिळवण्यासाठी घडविली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.