Bamanbhati Water Crisis in Agriculture Land Dainik Gomantak
गोवा

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Bamanbhati Water Crisis: वास्तवात पाण्याचा निचरा एक ओहोळातून होत होता, मात्र कोणा एका धनाढ्य व्यक्तीने त्या ओहोळात काँक्रिट घालून रस्ता तयार केल्याने पाण्याचा निचरा होत नाही.

Sameer Panditrao

हरमल: बामणभाटी येथील शेतजमिनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेली चार वर्षे पडीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त करीत आहेत.

सुमारे १० हजार चौरस मिटर या जागेत किमान १ ५ते २० शेतकरी भातशेती, मिरची व अन्य उत्पादने घेत होते. परंतु येथील रस्त्याची उंची वाढविल्याने व या शेतातील पाणी निचरा होण्यास वाट नसल्याने पाणी तुंबून राहते. त्यामुळे गेली चार वर्षे ही शेती पडीक आहे.

वास्तवात पाण्याचा निचरा एक ओहोळातून होत होता, मात्र कोणा एका धनाढ्य व्यक्तीने त्या ओहोळात काँक्रिट घालून रस्ता तयार केल्याने पाण्याचा निचरा होत नाही. डोंगरावरून येणारे पाणी शेत जमिनीत साचून राहते. त्यामुळे येथे शेती करता येत नाही, असे शेतकरी ठाकूर यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांकडून पाहणी, पण...

कृषी, बांधकाम व जलस्रोत खात्याचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली, मात्र आतापर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. उपाययोजना झाल्यास १० हजार चौरस मीटर जमीन लागवडीखाली येईल,असे शेतकरी दत्ताराम ठाकूर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT