bacchu kadu Dainik Gomantak
गोवा

Bachchu Kadu : पुन्हा गुवाहाटी करायला लावू नका; बच्चू कडूंचा भाजपाला नाव न घेता इशारा

शपथविधी सर्वांना घेऊन करायला हवा होता अशी खंत व्यक्त केली

दैनिक गोमन्तक

Bachchu Kadu In Goa : महाराष्ट्रात घडत असलेले राजकारण सामान्य जनतेच्या बुद्धीबाहेरचे आहे. त्यामुळे जनता संभ्रमित झाली आहे, असे मत महाराष्ट्रातील माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

दिव्यांगांचे केंद्रीय पातळीवरचे संघटन करण्यासाठी बच्चू कडू आपल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह गोव्यात आले आहेत. त्यांनी स्थानिक दिव्यांग संघटनांशी चर्चा केली.

महाराष्ट्रात हे घडत आहे ते लोकांच्या बुद्धीच्या बाहेरचे आहे. याला लोक त्रासलेले आहेत. यातून वाईट काही घडू नये इतकीच अपेक्षा. आपल्या पक्षहितासाठी आधी सोबत घेतलेल्यांना नाराज करण्याचे काम काहीजण करत आहेत. शपथविधी करायचाच होता तर तो सर्वांना घेऊन करायला हवा होता, अशी टीका भाजपाचे नाव न घेता कडू यांनी केली. पुन्हा गुवाहाटी करायला लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

2024 मध्ये बदल घडेल

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता कोणाला निवडून देईल व भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांचे एकत्रीकरण कसे होईल? यावरतीच केंद्रातील सत्ता अवलंबून आहे.

केंद्रातील सत्ता बदलल्यास महाराष्ट्र आणि इतर राज्यांतही मोठे बदल होतील, असा अंदाजही कडू यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि भारत राष्ट्र समितीच्या वतीने महाराष्ट्रात निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT