Pakistan PM Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Sindoor: पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार होता? शाहबाज शरीफ यांनी स्पष्टच सांगितलं

Pakistan PM Shehbaz Sharif: आर्थिक हालाखीने पाकिस्तानात आता राजकीय धोक्याची घंटा वाजू लागली आहे. पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेबद्दल अटकळ बांधली जात आहे.

Manish Jadhav

Pakistan PM Shehbaz Sharif: आर्थिक हालाखीने पिचलेल्या पाकिस्तानात आता राजकीय धोक्याची घंटा वाजू लागली आहे. पाकिस्तानात राजकीय अस्थिरतेबद्दल अटकळ बांधली जात आहे. सत्ता बदलाच्या शक्यतेने जोर धरलेला असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षादरम्यान अण्वस्त्रांचा वापर करण्याची शक्यता फेटाळून लावली. शरीफ म्हणाले की, त्यांच्या देशाचा अण्वस्त्र कार्यक्रम "शांततापूर्ण आणि स्वसंरक्षणासाठी" आहे.

दरम्यान, शनिवारी (12 जुलै) राजधानी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या समूहाला संबोधित करताना शरीफ यांनी ही टिप्पणी केली. मे महिन्यात झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षाचा संदर्भ देत पंतप्रधान शरीफ म्हणाले की, भारतीय लष्करी हल्ल्यात 55 पाकिस्तानी नागरिक मारले गेले. तथापि, त्यांनी यावर भर दिला की, पाकिस्तानने (Pakistan) या हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला

युद्धादरम्यान अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता पंतप्रधान शरीफ म्हणाले की, "पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम केवळ शांततापूर्ण हेतूंसाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी आहे, आक्रमणासाठी नाही."

भारत आणि पाकिस्तानमधील हा लष्करी संघर्ष तेव्हा सुरु झाला जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले, ज्यामध्ये 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले, ज्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, भारतीय सैन्याने 7 मे रोजी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा मुख्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बहावलपूरसह नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने हे हल्ले केले.

दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये सध्या नेतृत्व बदलाच्या संभाव्य अफवा सतत सुरु आहेत. सततच्या अफवांदरम्यान पंतप्रधान शरीफ यांनी अध्यक्ष आसिफ अली झरदारी पद सोडू शकतात आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर अध्यक्षपद स्वीकारु इच्छितात असे दावे फेटाळून लावले.

शुक्रवारी स्थानिक मीडिया हाऊस द न्यूजला दिलेल्या मुलाखतीत शरीफ यांनी या वृत्तांना "निराधार अटकळ" म्हटले. शरीफ म्हणाले की, "फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी कधीही राष्ट्रपती होण्यात रस दाखवला नाही आणि अशी कोणतीही योजना नाही." त्यांनी यावरही जोर दिला की, झरदारी आणि मुनीर दोघांशीही त्यांचे संबंध परस्पर आदर आणि देशाच्या प्रगतीसाठी सामायिक वचनबद्धतेवर आधारित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT