United Nations|Pakistan|India|Ram Mandir Dainik Gomantak
ग्लोबल

'इस्लामशी संबंधित वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करा', भारतातील मशिदींबाबत पाकिस्तानचे UN ला पत्र

Ram Mandir: या प्रवृत्तीमुळे भारतीय मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणासाठी तसेच प्रदेशातील सौहार्द आणि शांतता यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Ashutosh Masgaunde

'Intervene to protect heritage sites related to Islam', Pakistan's letter to UN on mosques in India:

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून पाकिस्तान भारतावर नाराज आहे. दरम्यान, भारतातील इस्लामिक स्थळांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांना (UN) केली आहे.

संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी नुकतेच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान ही मागणी केली. ही बैठक ओआयसीच्या सदस्य देशांदरम्यान होती.

यापूर्वी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या अभिषेकनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून त्याचा तीव्र निषेध केला होता.

निवेदनात पाकिस्तानने म्हटले होते की, उन्मादी जमावाने ६ डिसेंबर १९९२ रोजी शतकानुशतके जुनी मशीद पाडली होती. भारतातील सर्वात मोठ्या न्यायालयाने या घटनेला जबाबदार असलेल्यांना निर्दोष सोडले हे निंदनीय आहे. किंबहुना त्याच ठिकाणी राम मंदिर उभारणीलाही मंजुरी देण्यात आली होती.

पाकिस्तानी न्यूज वेबसाईट 'द डॉन'च्या वृत्तानुसार, मुनीर अक्रम यांनी युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशनचे उच्च अधिकारी मिगुएल एंजल मोराटिनोस यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे.

भारतातील अयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर बांधण्याचा पाकिस्तान तीव्र निषेध करतो, असे या पत्रात लिहिले आहे.

या प्रवृत्तीमुळे भारतीय मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कल्याणासाठी तसेच प्रदेशातील सौहार्द आणि शांतता यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.

भारतातील इस्लामशी संबंधित वारसा स्थळांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या राजदूताने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

यूएनला लिहिलेल्या पत्रात मुनीर अक्रम यांनी पुढे लिहिले आहे की, भारतातील मुस्लिम धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी तुम्ही तातडीने हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी मी हे पत्र लिहित आहे. इस्लामशी संबंधित वारसा स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आणि भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे.

संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी पुढे लिहिले आहे की, अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक भारतातील मशिदी नष्ट करण्याचे प्रयत्न आणि धार्मिक भेदभाव दर्शवतो. बाबरी मशिदीच्या पलीकडे प्रकरण गेले आहे. भारतातील इतर मशिदींनाही असाच धोका आहे.

मुनीर अक्रम पुढे म्हणाले, "दु:खाने, ही एक वेगळी घटना नाही. कारण वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील शाही इदगाह मशिदीसह इतर मशिदींनाही विध्वंसाचा धोका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

Bicholim Accident: डिचोलीत जीपगाडीची झाडाला धडक, कर्नाटकमधील तिघेजण जखमी; सहा पर्यटक सुखरूप

Uguem Firing: उगवे गोळीबार प्रकरणात दोघे पोलिस! एकूण 5 जणांना अटक; गुप्तचर यंत्रणेच्या आधारे कारवाई

वागातोर नाईट क्लबमध्ये अरेरावीचा कळस! बाऊन्सर्सनी पर्यटकांना बडवले; लोखंडी सळ्या, दांडक्यांनी केली मारहाण

SCROLL FOR NEXT