Operation Sindoor Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Sindoor: भारतीय सैन्यानं घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला, 9 दहशतवादी तळं केले उद्ध्वस्त

India strike on Pakistan: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्याचा बदला घेतला आहे.

Sameer Amunekar

Operation Sindoor, India Attacks Pakistan

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भीषण हल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

7 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे हवाई हल्ले त्या ठिकाणांवर करण्यात आले जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करण्यात आलं होतं.

भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील दहशतवादी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला.

भारतीय सैन्य दलानं या हवाई हल्ल्याआधी सोशल abpabpमीडियावरुन एक पोस्ट केली होती. “प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः” आणि Ready to Strike, Trained to Win”, असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळातच पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला.

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला पाकिस्तानकडून घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिलीय. ‘भारत माता की जय.’ असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम योगी आदित्यनाथ यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याबाबत पोस्ट केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT