पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संर्घष वाढत आहे. आता भारताने पाकिस्तानच्या रावळपिंडी स्टेडियमवर हल्ला करून ते स्टेडियम उद्ध्वस्त केलं आहे. या त्यामुळे आता या स्टेडियममध्ये होणारे सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत. भारताच्या ड्रोन हल्ल्यात स्टेडियम उद्ध्वस्त झाले आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग २०२५ सुरू आहे. ८ मे रोजी रावळपिंडीच्या मैदानावर पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात सामना होणार होता. पण आता भारताने ड्रोन हल्ल्याद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे आणि स्टेडियम उडवले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएसएल २०२५ चे सामने लाहोर आणि रावळपिंडीत होणारे सामने कराचीला हलवण्यात आले आहेत. जर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला तर त्याचा परिणाम पाकिस्तान सुपर लीग २०२५ वर होऊ शकतो, असे मानले जाते.
पाकिस्तान सुपर क्रिकेट लीग २०२५ मध्ये आतापर्यंत ३४ पैकी २४ सामने खेळले गेले आहेत. पेशावर झल्मी विरुद्ध कराची किंग्ज यांच्यातील सामना ८ मे रोजी खेळला जाणार आहे. हा सामना रालपिंडी येथे खेळला जाणार होत. आता उर्वरित सामने कराचीला हलवले जाऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.