Celebrations on Ambedkar Jayanti in Mhow Twitter
देश

बाबासाहेबांच्या घरातील भव्य सभागृहात बसून करता येणार भगवान बुद्धांची पूजा

कोरोनाच्या दोन वर्षानंतर महू येथे पुन्हा एकदा संविधान निर्माता बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा होणार

दैनिक गोमन्तक

इंदूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती आहे. त्याचे जन्मस्थान महू. या ठिकाणी यंदा 5 लाख लोक येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून येथील कार्यक्रम बंद होता. त्यामुळे यावेळी गर्दी जास्त होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस आणि प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर महू येथे पुन्हा एकदा संविधान निर्माता बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती उत्सव साजरा होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात देश-विदेशातील अनुयायी आंबेडकर स्मारकावर पोहोचणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. मात्र, अकोला ट्रेन रद्द असल्याने महाराष्ट्रातून येणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. (Celebrations on Ambedkar Jayanti in Mhow)

6 प्रकारच्या पदार्थांची सोय

बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती उत्सवात सहभागी होण्यास अनुयायांची सुरुवात झाली आहे. आंबेडकर स्मारकासमोर पहिल्यांदाच दूरदूरवरून येणाऱ्या नागरिकांसाठी घुमट बांधण्यात आला आहे. त्यात कुलर-पंखेही बसवण्यात आले आहेत. स्वर्ग मंदिर संकुलातील फूड हॉलमध्ये सहा प्रकारचे पदार्थ तयार केले जात आहेत. यामध्ये राम भजी, लांजी, खिचडी, गोड नुकती, मिर्ची लोणची आणि पुरी दिली जाईल. अन्न शिजवण्यासाठी 20 भट्ट्या करण्यात आल्या आहेत. यावर सलग तीन दिवस जेवण तयार केले जाईल. यावेळी अनुयायांना टोकनऐवजी ताटात जेवण दिले जाणार आहे. आंबेडकर स्मारकाच्या प्रवेश मार्गावर लाल गालिचा अंथरला जात आहे. या मार्गाने अनुयायी बाबा साहेबांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी स्मारकाच्या आत जातील आणि त्यासोबतच त्यांना आतील सभागृहात बसून बुद्धाची पूजा करता येणार आहे.

स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव

महू शहराची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. यामध्ये 16 टक्के लोक अनुसूचित जातीचे आहेत. या 16 पैकी सुमारे 10 हजार लोक महाराष्ट्रातील स्थलांतरित आहेत ज्यांनी महू येथे वास्तव्य करण्यास सुरवात केली आहे. बहुतांश स्थलांतरित हे अकोला आणि आसपासच्या भागातील आहेत. याठिकाणी अनुसूचित जातीच्या लोकांना कोणत्याही विशेष सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. येथील लोकांची अवस्था दयनीय असल्याचे संत रविदास दलित उत्थान समितीचे अध्यक्ष गबर सिंग सांगतात. अनेक योजनांचा लाभही लोकांना मिळत नाही. देशात स्वच्छता मोहीम सुरू आहे, पण त्याचा येथे थांगपत्ताही दिसत नाही. येथे राहणारे लोक संपुर्ण इंदूर शहर स्वच्छ करतात आणि इंदूर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर आहे पण या लोकांची काळजी कोण घेणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

Horoscope: भानु सप्तमीचा दुर्मिळ शुभयोग! 'या' राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; मान-सन्मान, यश आणि धनलाभाचे प्रबळ संकेत

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

SCROLL FOR NEXT