Varun Gandhi Dainik Gomantak
देश

'देश के आर्थिक शत्रुओं पर रहमदिली...': वरुण गांधींनी मोदी सरकारला दिला घरचा आहेर

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून भाजपचे लोकसभा खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधून भाजपचे लोकसभा खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे. कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा करुन परदेशात पळून गेलेल्यांवरुन गांधींनी केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला. (Varun Gandhi Has Once Again Criticized The Central Government)

गांधी म्हणाले की, '7 वर्षांत सरकार त्यांच्याकडून पुरेशी वसुली करु शकले नाही.' विजय मल्ल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi), मेहुल चोक्सी (Mehul Choksi) आणि ऋषी अग्रवाल यांची नावे घेत केंद्र सरकारला घेरले आहे.

त्यांनी ट्विट करत पुढे म्हटले की, 'गेल्या 7 वर्षात 67 हजार कोटींची चोरी करुन देश सोडून गेलेल्यांवर आपेक्षित करावाई करण्यात आलेली नाही. बचत खात्यावरील व्याजदर आज ऐतिहासिकदृष्ट्या नीचांकी पातळीवर असताना देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.'

दरम्यान, विजय मल्ल्या यांच्यावर अनेक बँकांकडून घेतलेले सुमारे 9,000 कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. दुसरीकडे नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेत 14000 कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. अलीकडेच, ABG शिपयार्ड लिमिटेडचे​माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांचे नाव 22,842 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात जोडले जात आहे.

शिवाय, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि ऋषी अग्रवाल यांच्यावर निशाणा साधताना वरुण गांधी म्हणाले की, 'हे लोक आपले जीवन आनंदाने जगत आहेत. मात्र सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT