UP: प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांत आठ मुलांचा मृत्यू  Dainik Gomantak
देश

UP: प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांत आठ मुलांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये गेल्या एका आठवड्यात 8 मुलांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये (Mathura) गेल्या एका आठवड्यात 8 मुलांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. या मुलांचा मृत्यू तापामुळे (Fever) झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत प्रशासनाने (Administration) वेळीच कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे येथील ग्रामस्थामध्ये प्रशासनाबद्दल रोष दिसून येत आहे. उत्तर प्रदेशामधील मथुरा शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कोह (Koh) गावात गेल्या एका आठवड्यात सुमारे आठ मुलांचा (Eight children) तापामुळे मृत्यू (Death) झाला आहे. माहिती मिळताच उपजिल्हादंडाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना गुप्ता सोमवारी आरोग्य विभागाच्या (Department of Health) फिरत्या पथकसह गावी पोहोचल्या.

* रक्ताचे नमुने घेण्यात आले

हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने रक्ताचे नमुने घेतले. गावकऱ्यांनी उपजिल्हादंडाधिकारी संजीव वर्मा आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना गुप्ता आणि अतिरिक्त मुख्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप कुमार इत्यादीना सांगितले की, गावात गेल्या आठ-दहा दिवसांपासून तापाचा उद्रेक निर्माण झाला आहे.

* प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत

तापामुळे चार दिवसांत आठ मुलांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. सीएमओ म्हणाले, गावातील प्रत्येक रुग्णांची तपासणी केली जात असून नमुने घेतले जात आहेत. याचा अहवाल आल्यानंतर परिस्थिति स्पष्ट होईल. तसेच ग्रामस्थांचा आरोप आहे की, माहिती देऊनही प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT