Strait of Hormuz war Dainik Gomantak
देश

होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! भारताची 18 जहाजे अडकली; देशावर ऊर्जा संकटाचे सावट

Global war impact India : मध्यपूर्वेतील युद्ध आता भीषण वळणावर पोहोचले असून, त्याचा थेट फटका भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बसला आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील युद्ध आता भीषण वळणावर पोहोचले असून, त्याचा थेट फटका भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बसला आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या 'होर्मुझची सामुद्रधुनी' सध्या युद्धामुळे ठप्प झाली आहे. या भागात भारताचा कच्चा तेल, एलपीजी आणि एलएनजी पुरवठा करणारी तब्बल १८ भारतीय जहाजे अडकून पडली आहेत. याशिवाय १० जहाजेही भारताकडे येण्यासाठी याच भागात ताटकळत उभी असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

सामुद्रधुनीत जहाजांची कोंडी आणि खलाशांची सुरक्षा

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या पश्चिमेला अडकलेल्या १८ भारतीय जहाजांमध्ये ३ एलपीजी टँकर, १ एलएनजी कॅरियर आणि ४ कच्च्या तेलाच्या टँकरचा समावेश आहे.

या जहाजांवर सुमारे ४८५ भारतीय खलाशी असून सरकार त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या भागात ५०० हून अधिक जहाजे अडकली आहेत. इराणने "बिनशत्रू" जहाजांना समन्वय साधून जाण्याची परवानगी दिली असली, तरी धोका अद्याप टळलेला नाही.

वाढता विमा हप्ता आणि आर्थिक फटका

युद्धामुळे या सागरी क्षेत्राला 'उच्च जोखीम क्षेत्र' घोषित करण्यात आले आहे. याचा परिणाम व्यावसायिक जहाजांच्या विमा हप्त्यावर झाला आहे. युद्धापूर्वी जो विमा हप्ता ०.०४ टक्के होता, तो आता थेट ०.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

काही प्रकरणांमध्ये हा आकडा याहूनही अधिक असू शकतो. या वाढीव खर्चामुळे आगामी काळात इंधन आणि गॅसच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताला लागणारे ४० टक्के कच्चे तेल आणि ९० टक्के एलपीजी याच मार्गाने येतो, त्यामुळे हा मार्ग भारतासाठी जीवनवाहिनी ठरतो.

आतापर्यंत ८ जहाजे सुखरूप बाहेर

परिस्थिती गंभीर असली तरी काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत ८ भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून यशस्वीरित्या बाहेर पडली आहेत. यामध्ये 'BW TYR' हे ९४,००० टन एलपीजी घेऊन ३१ मार्च रोजी मुंबईला पोहोचणार आहे, तर 'BW ELM' हे १ एप्रिल रोजी मंगळूरला पोहोचण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही जग वसंत आणि जग लाडकी यांसारख्या जहाजांनी सुरक्षित प्रवास पूर्ण केला आहे. भारत सरकार सध्या मुत्सद्दी पातळीवर इराणशी चर्चा करून अडकलेल्या जहाजांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाकड्यांच चाललंय काय? शाहीन आफ्रिदीनं सिकंदर रझाला गुपचूप हॉटेलमध्ये नेलं; रात्री 2 तास दोघांमध्ये... बोर्डानं ठोठावला 10 लाखांचा दंड

Lairai Jatra: ‘लईराई’च्या जत्रेत स्टॉलसाठी मोकळीक द्या! खाजेकार संघटनेची मागणी; व्यावसायिक अस्वस्थ

शेतजमिनी, डोंगर सगळेच कत्तल करून 'बिल्डर लॉबी'ला विकायला लागलो तर इमारतीची जंगले विस्तारतील; आकारवाड्यातील वनराईची श्रीमंती

VIDEO: गोव्यातील प्रसिद्ध किनारा, पण खाडीचे पाणी मात्र प्रदूषित; काळसर पाण्यामुळे नागरिक, पर्यटक त्रस्त

Bihar Nalanda Stampede: नालंदा हादरले! शीतला देवी मंदिरात चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT