Mahatma Gandhi statue in Punjab ANI
देश

पंजाबमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, सुव्यवस्था बिघडल्याचा कॉंग्रेसचा आरोप

या घटनेत सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्हा शहरी काँग्रेसचे अध्यक्ष अशोककुमार सिंगला यांनी केली.

दैनिक गोमन्तक

भटिंडा: पंजाबमधील भटिंडा येथील सार्वजनिक उद्यानातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. ही घटना अज्ञातांनी घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

पोलीस स्टेशन प्रभारी हरजोत सिंग मान यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून रमण मंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, त्यासाठी उद्यानात व परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.

या घटनेत सहभागी असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी जिल्हा शहरी काँग्रेसचे अध्यक्ष अशोककुमार सिंगला यांनी केली. काँग्रेसने सत्ताधारी आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. पंजाबमध्ये 'आप'ची सत्ता आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचे, एवढेच नाही तर गुन्हेगारी वाढत असून आता महात्मा गांधींचा पुतळाही सोडला जात असल्याचा आरोप काँग्रेसने सत्ताधारी पक्षावर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT