Rawatram and Hiraram Dewasi Amazing love story of 2 brothers in Rajasthan Dainik Gomantak
देश

अजब भावांची गजब प्रेम कहाणी

दोन्ही भाऊ आयुष्यभर एकत्र राहिले आणि एकत्रच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या दोन भावांचा एकत्र जगाचा निरोप घेणे हे गावकऱ्यांसाठी एक गूढच राहिले

दैनिक गोमन्तक

भारत (India) हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे तुम्हाला अनेक प्रकारच्या कथा ऐकायला मिळतात. पण आज आपण ज्या कथेबद्दल बोलत आहोत ती खूपच अनोखी आहे. राजस्थानच्या (Rajasthan) सिरोही जिल्ह्यातील रेवदार उपविभागातील नागानी गावात राहणाऱ्या दोन भावांची ही कहाणी (Love Story) आहे. येथे रावतराम आणि हिराराम देवासी नावाचे दोन भाऊ राहत होते. लहानपणापासूनच दोन भावांमध्ये इतकं प्रेम होतं की त्याच्या नात्याची मिसाल जवळच्या गावातही दिली जायची. त्यांच्या नावाने शपथाही घेतल्या जात होत्या. दोन्ही भावांचा मृत्यूही तीन दिवसांपूर्वी नैसर्गिकरित्या तीन ते चार मिनिटांच्या कालावधीत झाला आणि हाच विचित्र योगायोग त्याच्या बाबतीत निसर्गाने घडवून आणला आहे. (Rawatram and Hiraram Dewasi Amazing love story of 2 brothers in Rajasthan)

आजच्या काळात एवढं प्रेम बघून कुणलाही नवल वाटेल पण वास्तव नाकारता येत नाही. या भावांचे बालपण एकत्रच गेले. एकत्र राहणे हा त्यांच्या दिनचर्येचा भाग होता. ते लहानपणी 2-3 वर्ग काही शिकले. दोघांचे लग्नही एकाच दिवशी झाले होते. गावात आणि समाजात कोणत्याही घरात खुलासा करण्याची गरज पडली की दोन्ही भाऊ एकत्र जाऊन विसंवाद दूर करत होते. रावतराम यांचे वय सुमारे 75 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि हिराम रावतरामपेक्षा एक-दोन वर्षांनी लहान होता.

भावांच्या प्रेमानंतर आता त्यांचा मृत्यूची चर्चा

कालांतराने गावातील प्रत्येकाला बंधुभाव आणि प्रेमाचा मार्ग दाखविणाऱ्या या भावांची उदाहरणे देण्यात आली. आयुष्यभर एकत्र राहिल्यानंतर रावतराम आणि हिरालाल यांनी 3 दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूची ही घटनाही अशा प्रकारे घडली की, तोही चर्चेचा विषय बनला. दोन्ही भावांचे अंत्यसंस्कारही एकाच ठिकाणी एकत्र पार पडले. दोन्ही भावांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

4 मिनिटांत सोडले प्राण

नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, दोघांचा मृत्यू केवळ तीन ते चार मिनिटांच्या फरकाने झाला . यादरम्यान रावताराम यांना मृत्यूची जाणीव झाली. रावतरामने भाऊ हिरारामला सांगितले की, माझे काम आता या जगात पूर्ण झाले आहे. आता मी निघत आहे. असे म्हणत काही क्षणातच रावताराम याचा मृत्यू आला. हे पाहून भाऊ हिरारामनेही भाऊ रावतरामला मीही येतो म्हणत 3-4 मिनिटांत आपले प्राण सोडले.

गावकऱ्यांसाठी एक गूढच

अशा प्रकारे दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याची माहिती संपूर्ण गावात पसरली. दोघांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. दोघांनाही अंत्यसंस्कारासाठी नेले तेव्हा प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. दोन्ही भाऊ आयुष्यभर एकत्र राहिले आणि एकत्रच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या दोन भावांसह जगाचा निरोप घेणे हे गावकऱ्यांसाठी एक गूढच राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

SCROLL FOR NEXT