Pahalgam attack travel alternatives  Dainik Gomantak
देश

पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांचा प्लॅन चेंज, गोव्यासह मनाली, शिमल्याला पसंती; विमानाचे दरसुद्धा खिशाला परवडणारे

Safe travel destinations India: पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यातील बहुतेक पर्यटक होते.

Manish Jadhav

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, त्यातील बहुतेक पर्यटक होते. या घटनेनंतर बिलासपूरसह देशाच्या विविध भागातील पर्यटक जे उन्हाळ्यात काश्मीर आणि लडाखचा प्लॅन करतात त्यांनी आता त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात बिलासपूरमधील शेकडो लोक त्यांच्या कुटुंबासह काश्मीर, गुलमर्ग, पहलगाम आणि लडाखला भेट देतात. यावर्षीही अनेक कुटुंबांनी आधीच ट्रेन, विमान तिकिटे आणि हॉटेल्स बुक केली होती, पण या हल्ल्याची बातमी येताच अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले. डझनभर कुटुंबांनी त्यांचे तिकिटे आणि हॉटेल बुकिंग तात्काळ रद्द केले.

पर्यटन व्यवसायाशी संबंधित लोकांच्या मते, हल्ल्यानंतर सुमारे 20 ते 30 टक्के बुकिंगवर परिणाम झाला आहे. लोक केवळ काश्मीरमध्येच नाही तर लडाखसारख्या तुलनेने शांत असणाऱ्या भागातही जाण्यास घाबरत आहेत. या हल्ल्याचा परिणाम येत्या अमरनाथ यात्रेवरही दिसून येऊ शकतो. ट्रॅव्हल एजन्सीजचे संपूर्ण वर्षाचे उत्पन्न पर्यटन हंगामावर आधारित असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

विमान तिकिटे आता 25,000 रुपयांऐवजी 9,000 रुपयांना उपलब्ध

दुसरीकडे, दहशतवादी हल्ल्याचा परिणाम विमान भाड्यावरही दिसून येत आहे. हल्ल्यापूर्वी रायपूर ते श्रीनगर विमान तिकिटाची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती, परंतु आता वेगवेगळ्या विमान कंपन्यांचे दर कमी झाले असून रायपूर ते श्रीनगर विमान तिकिटे इंडिगोमध्ये 9 हजार रुपयांना आणि एअर इंडियामध्ये 11 हजार रुपयांना उपलब्ध आहेत. तर गोवा ते श्रीनगर या मार्गावरील विमान तिकिटाचा दर सध्या सुमारे 7800 रुपये इतका आहे. मात्र, काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे पर्यटक श्रीनगरला जाणे टाळत असल्याचे चित्र आहे.

लग्नानंतर हनिमूनसाठी काश्मीरला जाणाऱ्या अनेक नवविवाहित जोडप्यांनीही त्यांच्या प्लॅनमध्ये बदल केला आहे. बिलासपूरमधील अनेक नवविवाहित जोडप्यांनी आधीच विमान आणि हॉटेल बुक केले होते. पण हल्ल्याची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी भीतीच्या वातावरणात त्यांचे बुकिंग रद्द केले. आता ही जोडपी मनाली, उत्तराखंड, शिमला आणि गोवा अशा इतर सुरक्षित ठिकाणांकडे वळत आहेत.

दहशतवादी हल्ल्यानंतर लोक काश्मीर आणि अगदी लडाखलाही जाण्यास घाबरत आहेत. अमरनाथ यात्रेवरही याचा परिणाम होऊ शकतो. ज्यांच्याशी पॅकेजवर चर्चा झाली होती ते आता ते रद्द करत आहेत. या घटनेमुळे पर्यटक (Tourists) घाबरले आहेत. याचा थेट परिणाम 20 ते 30 टक्के बुकिंगवर झाल्याचे श्री साई टूर्स अँड ट्रॅव्हलर्सचे विनोद पांडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT