Congress Leader Adhir Ranjan Chaudhary  Dainik Gomantak
देश

Lok Sabha Elections 2024: ''आम्ही ममता बॅनर्जीकडे भीक मागितली नाही'', पश्चिम बंगालमध्ये 2 जागांची ऑफर केल्याने अधीर रंजन चौधरी भडकले

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु आहे.

Manish Jadhav

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु आहे. भाजपने पुन्हा सत्तेत राहण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे, विरोधी पक्षांनीही भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आपली ताकद लावायला सुरुवात केली आहे. यातच आता, इंडिया ब्लॉकमध्ये जागावाटपावरुन समन्वयापूर्वीच वादाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी थेट टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जींना युती नको आहे, असेही ते म्हणाले. ते मोदींची सेवा करण्यात मग्न आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

बुधवारी सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले होते की, तृणमूल काँग्रेसने (TMC) पश्चिम बंगालमध्ये केवळ दोन लोकसभेच्या जागा लढवण्याचा प्रयत्न युती पाटर्नर काँग्रेसने केला आहे. सूत्रांनी असेही सांगितले होते की, 2019 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीला राज्यात 43 टक्के मते मिळाली होती आणि 22 जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत तृणमूल बंगालमध्ये प्रबळ पक्ष असून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना द्यावा, अशी इच्छा आहे.

दरम्यान, गुरुवारी काँग्रेसने टीएमसीच्या या फॉर्म्युल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ''ममता यांच्याकडे कोणी भीक मागितली हे मला माहीत नाही. आम्ही त्यांच्याकडे भीक मागत नाही. ममता स्वत: सांगत आहेत की, त्यांना युती हवी आहे. आम्हाला ममतांच्या दयेची गरज नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो.'' अधीर रंजन पुढे म्हणाले की, 'प्रत्यक्षात ममतांना युती अजिबात नको आहे. ममता मोदींची सेवा करण्यात मग्न आहेत.'

'आधीच्या निवडणूक निकालांवर आधारित जागांचा फॉर्म्यूला'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाचा फॉर्म्यूला स्पष्ट सूत्रावर आधारित आहे, ज्यामध्ये संसदीय निवडणुका आणि राज्य विधानसभा निवडणुकांचे मूल्यांकन समाविष्ट आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लोकसभेच्या सर्व 42 जागा लढवल्या आणि मालदा दक्षिण आणि बेरहामपूर या दोनच जागा जिंकता आल्या. सर्वात जुन्या पक्षाला केवळ 5.67 टक्के मते मिळाली, जी सीपीआय (एम) पेक्षाही कमी आहे. माकपला 6.33 टक्के मते मिळाली.

यापूर्वी, 19 डिसेंबर रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची चौथी बैठक झाली होती. त्यात टीएमसीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना इंडिया ब्लॉकचा पंतप्रधान चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, हा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. दलित समाजातून आलेले खर्गे हा एक चांगला पर्याय असल्याचे टीएमसीचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते 58 जागांवर प्रभाव टाकू शकतात.

मात्र, नंतर बातम्या आल्या की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ममतांच्या प्रस्तावावर नाराज आहेत. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नितीश यांच्याशी फोनवर चर्चा केली. आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने नितीश यांना समन्वयक बनवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT