Mahant Yeti Narasimhanand Dainik Gomantak
देश

'भारताला इस्लामिक देश होण्यापासून रोखण्यासाठी...'

हरिद्वार द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात जामिनावर सुटलेले वादग्रस्त महंत यती नरसिंहानंद (Mahant Yeti Narasimhanand) यांच्या संघटनेने रविवारी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले.

दैनिक गोमन्तक

हरिद्वार द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात जामिनावर सुटलेले वादग्रस्त महंत यती नरसिंहानंद यांच्या संघटनेने रविवारी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी म्हटले की, ''हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्म दिला पाहिजे. जेणेकरुन भारताला (India) इस्लामिक देश होण्यापासून रोखता येईल. यती नरसिंहानंद यांनी या महिन्याच्या सुरुवातीला मथुरेत असेच वक्तव्य केले होते.'' (Mahant Yeti Narasimhanand's organization has once again made a controversial statement)

भारत हे प्रजासत्ताक आहे कारण इथे जास्त हिंदू आहेत: सत्यदेवानंद

यती सत्यदेवानंद सरस्वती हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मुबारकपूर येथे तीन दिवसीय 'धर्म संसद' च्या पहिल्या दिवशी म्हणाले- ''भारत हे प्रजासत्ताक आहे कारण इथे हिंदू बहुसंख्य आहेत. परंतु मुस्लिम लोक पद्धतशीरपणे अधिक मुले जन्माला घालतायेत. त्यांचा मुख्य हेतू लोकसंख्या वाढवणे हाच आहे. त्यामुळेच आमच्या संघटनेने हिंदूंना (Hindu) अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरुन भारताला मुस्लीम लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानसारखा इस्लामिक देश होण्यापासून रोखता येईल.''

सत्यदेवानंद सरस्वती यांना जेव्हा विचारण्यात आले की, अशा वक्तव्यांमुळे दोन मुले जन्माला घालण्याच्या राष्ट्रीय धोरणाचे उल्लंघन होत नाही का, तेव्हा ते म्हणाले की, ''नागरिकांना दोनच मुले जन्माला घालण्याची परवानगी देणारा कोणताही कायदा नाही.''

पोलिसांनी नोटीस बजावली

यती नरसिंहानंद, अन्नपूर्णा भारती यांच्यासह देशभरातील अनेक महंतही या सभेला पोहोचले होते. हिमाचल प्रदेश पोलिसांनी सत्यदेवानंद सरस्वती यांना नोटीस बजावून कोणत्याही धर्म किंवा जातीविरुद्ध द्वेष पसरवणारी भाषा वापरु नये, असे निर्देश दिले आहेत.

पोलीस कायदा 2007 च्या कलम 64 अन्वये जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये उना जिल्ह्यातील आंब पोलीस ठाण्याचे एसएचओ यांनी नियमांचे पालन न केल्यास प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

यती नरसिंहानंद जामिनावर बाहेर

गेल्या वर्षी 17 ते 19 डिसेंबर दरम्यान यती नरसिंहानंद यांनी हरिद्वारमध्ये धर्मसंसदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे करण्यात आली होती. यानंतर यति नरसिंहानंद यांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

यानंतर त्यांनी गेल्या रविवारी दिल्लीतील बुरारी मैदानावर झालेल्या हिंदू महापंचायतमध्ये भाग घेऊन तिथे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते यावेळी म्हणाले, 'जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला देशाचा पंतप्रधान बनवले तर येत्या 20 वर्षांत 50% हिंदू धर्म स्वीकारतील.' त्यांनी हिंदूंना त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलण्याचे आवाहनही केले होते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT