Justice Sanjay Kishan Kaul Dainik Gomantak
देश

''काश्मिरी पंडितांना कोणत्याही सरकारकडून न्याय मिळाला नाही'', कलम 370 वर निकाल देणारे जस्टिस कौल म्हणाले

Justice Sanjay Kishan Kaul: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी काश्मिरी पंडितांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Manish Jadhav

Justice Sanjay Kishan Kaul: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी काश्मिरी पंडितांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान कौल म्हणाले की, 'काश्मिरी पंडितांना कोणत्याही सरकारकडून न्याय मिळाला नाही.' कौल हे जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या बाजूने निकाल देणाऱ्या खंडपीठाचा एक भाग असल्याची माहिती आहे. बार आणि बेंचला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती कौल यांनी सांगितले की, 'काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या वेळी त्यांचे घरही जाळण्यात आले होते.' पण, या अनुभवाचा आपल्या निर्णयावर कोणत्याही प्रकारे परिणाम झाला नाही, असेही ते म्हणाले.

न्यायमूर्ती कौल पुढे म्हणाले की, 'मी 22 वर्षे न्यायाधीश होतो. या काळात, तुम्ही तुमची वैयक्तिक प्राधान्ये बाजूला ठेवून तुमचा स्वतःचा दृष्टीकोन तयार करायला शिकता.' ते पुढे म्हणाले की, 'आपण म्हणू शकतो की न्याय हा अराजकीय आहे या अर्थाने त्याचा राजकीय संबंध नाही? प्रत्येक न्यायाधीशाचा एक विश्वास असतो, परंतु त्यांना त्यांच्या निर्णयापासून दूर ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हा आमच्या कामाचा एक भाग आहे.'

4 लाखांहून अधिक लोक विस्थापित : कौल

जम्मू-काश्मीरबाबत ते म्हणाले की, ''मी सर्वत्र वेदना पाहिल्या हे खरे आहे. काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले. 4.5 लाख लोक विस्थापित झाले. कोणत्याही सरकारकडून त्यांना न्याय मिळाला नाही. परिस्थिती इतकी भीषण बनली होती की लष्कराला पाचारण करावे लागले. ते सामान्य कायदा आणि सुव्यवस्थेप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या मार्गाने युद्ध लढते. म्हणूनच मी स्टेट आणि नॉन-स्टेट एक्टर्सचा उल्लेख केला आहे.''

'1980 पर्यंत ते खूप सुरक्षित होते'

न्यायमूर्ती कौल म्हणाले की, या नरसंहारात विविध समुदाय पीडित ठरले. या गोंधळात एक संपूर्ण पिढी वाढलेली आपण पाहिली आहे. तेव्हा 5-6 वर्षांचा असलेला व्यक्ती आज 40 वर्षांचा असेल. अशा प्रकारे एक संपूर्ण पिढी बदलली. लोक एकत्र राहत असताना त्यांच्यापैकी बहुतेकांनी परिस्थिती पाहिली नाही. कौल शेवटी म्हणाले की, 'मी 1980 च्या दशकात श्रीनगरला जायचो, तिथे माझी बाग होती. काही राजकीय मुद्दे नक्कीच आहेत ज्यावर मला भाष्य करायला आवडणार नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT