Death Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: झोपेतच मृत्यूने कवटाळले, एकाच घरातील 5 जणांचा दुर्देवी मृत्यू

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील कांकेरमध्ये घराची भिंत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील कांकेरमध्ये घराची भिंत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. कांकेर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यानंतर सोमवारी घराची भिंत कोसळली. पखंजोर भागातील इरपनार गावात असलेल्या एका घराची भिंत कोसळल्याने ही धक्कादायक दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या (Police) पथकाला तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. बोटीच्या सहाय्याने हे पथक गावात पोहोचले. वास्तविक, या परिसरात मुसळधार पावसामुळे नाले तुंबले आहेत. सर्वत्र पूरस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाचे पथक बोटीच्या सहाय्याने गावात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे गावात जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. हा नक्षलग्रस्त भागही आहे. सोमवारी पहाटे हे कुटुंब आपल्या मातीच्या घरात झोपले होते. अचानक भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे पथक बोटीतून घटनास्थळी पाठवण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, 'कांकेरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे परिसरातील सर्व नद्या-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक गावांचा मुख्य रस्त्यापासून संपर्क तुटला आहे.' अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT