GT vs MI Eliminator 2025 Dainik Gomantak
देश

GT vs MI Eliminator: IPL एलिमिनेटरवर पावसाचं सावट, सामना न झाल्यास कोण होईल Eliminated? काय सांगतो नियम? वाचा

GT vs MI Eliminator 2025: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुल्लानपूर स्टेडियमवर एलिमिनेटर सामना खेळला जाईल. या सामन्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामना रद्द झाल्यास लागू कोणत्या संघाला फायदा होणार जाणून घेऊया.

Sameer Amunekar

आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-२ मध्ये खेळेल तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. एलिमिनेटर सामना मोहालीच्या मुल्लानपूर स्टेडियम (न्यू पीसीए स्टेडियम) येथे खेळला जाईल.

गुजरात टायटन्स सुरुवातीपासूनच नंबर-२ चा प्रबळ दावेदार होता, परंतु गेल्या २ सामन्यांमधील पराभवाने तो खराब केला. सुरुवातीच्या पराभवानंतर, मुंबई इंडियन्स देखील विजयाच्या रथावर स्वार होता, परंतु लीग टप्प्यातील शेवटच्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर, हार्दिक पंड्या आणि संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता या दोन्ही संघांना विजेतेपद जिंकण्यासाठी सलग ३ सामने जिंकावे लागतील.

एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-२ मध्ये जाईल आणि पराभूत संघ बाहेर पडेल हे स्पष्ट आहे, परंतु पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल? चला तुम्हाला नियम सांगूया.

आयपीएल प्लेऑफ २०२५ फॉरमॅट

आयपीएल प्लेऑफ फॉरमॅटनुसार, टॉप २ संघ क्वालिफायर-१ खेळतात, जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचतो आणि पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी क्वालिफायर-२ जिंकावे लागते. एलिमिनेटर सामना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये खेळला जातो. गुजरात टायटन्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे.

सामन्यात हवामान कसे असेल

३० मे रोजी मोहालीच्या मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर गुजरात आणि मुंबई यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जाईल. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता खेळवला जाईल. या दिवशी मोहालीत पावसाची शक्यता आहे. दुपारी मुसळधार पाऊस पडू शकतो, सामन्यादरम्यानही पावसाचा अंदाज आहे.

सामना रद्द झाला तर कोणता संघ बाहेर पडेल?

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्या एलिमिनेटर सामन्यासाठी राखीव दिवस नाही, म्हणजेच सामना एकाच दिवसात पूर्ण झाला पाहिजे. जर असे झाले नाही तर नियमानुसार पॉइंट टेबलमध्ये वरच्या स्थानावर असलेल्या संघाला फायदा मिळेल. म्हणजेच, या परिस्थितीत, मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर असल्याने बाहेर पडेल तर गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर असल्याने क्वालिफायर-२ मध्ये पोहोचेल.

आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये, फक्त क्वालिफायर-२ आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या नियमानुसार, जर पावसामुळे त्या दिवशी सामना झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी, जिथे सामना थांबवण्यात आला होता, तिथून सामना खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर १ जून रोजी आणि अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT